सहाव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला गीतेच्या अर्थाचे सार असा योगरूप अभिप्राय सांगताना म्हणतात ,
विषयांच्या ठिकाणी व कर्माच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता ,सर्व संकल्पांचा त्याग करून जो केवळ कर्तव्य असे कर्म करतो व कर्मफलाचा त्याग करतो तो खरा योगी होय. पण हा अहंकाराचा त्याग स्वतःच स्वतःला जिंकून करायचा असतो तरच कल्याण होईल ,अन्यथा कोश किड्या प्रमाणे आपणच आपला शत्रू होतो .ही गोष्ट नीट समजविण्यासाठी ते शुक नलीकेचा दृष्टांत देतात .
पोपटाला बसण्याकरिता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यावर जेंव्हा पोपटाच्या वजनाने नळी उलट बाजूला फिरते ,तेंव्हा वास्तविक पोपटाने उलटे होण्यामुळे उडून जावे ,,पण ही नळी सोडली तर आपण पडू वा मरू या शंकेने तो नळीला आपल्या चवड्यात धरूनच राहतो ,व मनात म्हणतो कि मी याला बांधला गेलो आहे ,अशा रीतीने कल्पनेलाच बांधला जाऊन तो आपला मोकळा असलेला चवडा अधिकच गुंतवतो -आता त्याला ओढून ,अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडत नाही -या पोपटाला दुसर्या कोणी अडकवले नसून त्याच्या मिथ्या कल्पनेनेच अडकवले आहे .
याचप्रमाणे ज्या पुरुषाने आपला देहाभिमान व संकल्प स्वतःच वाढविला आहे ,तो आपणच आपला शत्रू होऊन प्रपंच रुपी नळीला स्वतःच चिकटून राहतो व त्यामुळे संकल्प मुक्त आत्म्याच्या स्वतंत्र रूपाचा त्याला अनुभव येत नाही .अविवेकामुळे ,अविध्येमुळे तो स्वतःच स्वतःचा घात करून घेतो .
विषयांच्या ठिकाणी व कर्माच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता ,सर्व संकल्पांचा त्याग करून जो केवळ कर्तव्य असे कर्म करतो व कर्मफलाचा त्याग करतो तो खरा योगी होय. पण हा अहंकाराचा त्याग स्वतःच स्वतःला जिंकून करायचा असतो तरच कल्याण होईल ,अन्यथा कोश किड्या प्रमाणे आपणच आपला शत्रू होतो .ही गोष्ट नीट समजविण्यासाठी ते शुक नलीकेचा दृष्टांत देतात .
पोपटाला बसण्याकरिता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यावर जेंव्हा पोपटाच्या वजनाने नळी उलट बाजूला फिरते ,तेंव्हा वास्तविक पोपटाने उलटे होण्यामुळे उडून जावे ,,पण ही नळी सोडली तर आपण पडू वा मरू या शंकेने तो नळीला आपल्या चवड्यात धरूनच राहतो ,व मनात म्हणतो कि मी याला बांधला गेलो आहे ,अशा रीतीने कल्पनेलाच बांधला जाऊन तो आपला मोकळा असलेला चवडा अधिकच गुंतवतो -आता त्याला ओढून ,अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडत नाही -या पोपटाला दुसर्या कोणी अडकवले नसून त्याच्या मिथ्या कल्पनेनेच अडकवले आहे .
याचप्रमाणे ज्या पुरुषाने आपला देहाभिमान व संकल्प स्वतःच वाढविला आहे ,तो आपणच आपला शत्रू होऊन प्रपंच रुपी नळीला स्वतःच चिकटून राहतो व त्यामुळे संकल्प मुक्त आत्म्याच्या स्वतंत्र रूपाचा त्याला अनुभव येत नाही .अविवेकामुळे ,अविध्येमुळे तो स्वतःच स्वतःचा घात करून घेतो .
No comments:
Post a Comment