Saturday, February 9, 2013

sanjayache bhavishy

अठराव्या अध्यायाच्या अखेरीस धृतराष्ट्राने संजयास प्रश्न विचारला कि सांप्रत जे युध्द सुरु आहे त्यात शेवटी कोणाचा जय होईल ?संजय ,तुझे भविष्य जसे असेल तसे सांग .
यावर संजय म्हणाला ,महाराज ,चंद्र तेथे चांदणे ,शिव तेथे शक्ती ,संत तेथे सुविचार असायचाच ,त्याप्रमाणे ज्या स्वामींच्या योगाने चारही पुरुषार्थ सनाथ झाले तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असायचीच .आणि ज्याच्या जवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मि आहे त्याच्या सर्व सिद्धी दासी होतात  .कृष्ण हा स्वतः विजयाचे स्वरूप आहे -तो ज्या बाजूला त्या बाजूला जय त्वरेने मिळायचाच .अर्जुनही विजय नावाने प्रसिध्द आहे ,व जेथे लक्ष्मि तेथे विजयही निश्चित आहे .त्या अर्जुनाला श्रीकृष्ण व लक्ष्मि हे मायबाप असताना त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरू का होऊ नये ?त्याच्या देशाचे सर्व दगड चिंतामणी का होऊ नयेत?राजा विचार कर ,यात काही आश्चर्य आहे का ?ज्याचा बाप श्रीकृष्ण व आई लक्ष्मी आहे त्याच्या आधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत .ज्या पक्षाला लक्ष्मिपति उभा आहे तेथे मूर्तिमंत सर्व सिद्धी आहेत .याशिवाय अधिक मी दुसरे काही जाणत नाही
परिस हा लोखंडाला सुवर्ण रूप देणारा गुरु असला तरी जगाला पोसणारा व्यवहार सोनेच जाणते ,त्याप्रमाणे देवांच्या सामार्थ्यानेच बलवान झालेला अर्जुन देवा पेक्षाही अधिक बलवान आहे ,अशी ही अर्जुनाची स्तुती देवाला अधिक आवडते ,कारण आपल्या मुलाकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाची इच्छा असते .ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी अर्जुनरुपाने फळाला आली .श्रीकृष्ण कृपेने अर्जुन असा झाला कि तो जेथे तेथेच विजय यात तुला शंका वाटत आहे का ?म्हणून जेथे लक्ष्मि ,श्रीकृष्ण व अर्जुन आहेत तेथे विजय निश्चित आहे ,या बोलण्यास अन्यथा होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणवणार नाही अशी संजयाने गर्जना करून हात वर केला .

No comments:

Post a Comment