Tuesday, November 29, 2011

pahili ovi

ओम नमोजी आद्ध्या | वेद प्रतीपाध्या |
 जयजय स्वसंवेध्या |आत्मरुपा ||
या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी ओंकारास परमात्म्याचे रूप म्हणून मंगलाचरण केले आहे आणि ओंकाराचे वर्णन केले आहे .निर्गुण निराकार अशा शुद्ध ब्रम्हास ओंकाररूप कल्पून त्यांनी वास्तुनिर्देश्रूप मंगल साधले आहे ,तसेच त्याला नमन करून नमस्क्रीयारूप मंगल साधले आहे .
ओंकार हा ब्रह्माचे  रूप आहे म्हणून तो साध्य म्हणजे मिळवायची वस्तू आहे ,तसेच ओंकाराचा जप करण्याने भगवंताची प्राप्ती होते म्हणून तो साधन म्हणजे साध्य मिळवण्याचा मार्गही आहे साध्य आणि साधन दोन्ही तोच आहे .ओंकार हा ब्रह्माचा उदगार आहे  .अध्या     शब्दाने ते दाखवतात कि तो सर्व भाषांचे मूळ आहे .ओंकार हा वेदांच्या वर्णनाचा विषय आहे म्हणून त्यास वेद्प्रतीपाध्या म्हटले आहे .तो स्वतः स्वतःला जाणण्यास योग्य आहे म्हणून स्व्संवेध्या .तो सर्वव्यापी आत्म्याचे रूप आहे म्हणून आत्मरुपा .या वर्णना नंतर त्याचा जयजयकार केला आहे .
आध्य या विशेषणाने हे सांगितले आहे कि ब्रह्म हे जगाच्या उत्पत्ती पूर्वीचे आहे आणि उत्पत्तीचे कारण आहे .ते स्वतः अविनाशी आणि अनंत आहे .या गोष्टीस वेदातील तत्व्ज्ञानाचा  संदर्भ आहे म्हणून त्यास वेद्प्रतीपाध्या म्हंटले आहे .ज्या वस्तूचे वर्णन करण्यास तिला जाणून घेण्यास कोणतीही दुसरी वस्तू नाही ,तो स्वयमप्रकाशी
आहे ,आपण फक्त अज्ञानाच्या आवरणाचा नाश करायचा असतो ,मग तो त्याच्याच प्रकाशाने दिसतो .हे स्व्संवेध्या या शब्दाने सांगितले आहे .
ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत ,आत्मा हे जीवाच्या जागी असलेले ब्रह्मरूप आहे ,सत चीत ,आनंद हे आत्म्याचे मुल रूप आहे .अशा या आत्म रुपास  श्री ज्ञानेश्वर वंदन करतात .

Friday, November 25, 2011

mangalacharane

वैदिक परंपरे प्रमाणे कोणत्याही कार्याच्या आरंभी" मंगल "म्हणजे परमात्म्यास नमन करावे .ग्रंथरचना हे मोठे कार्य असल्याने त्याच्या सुरवातीला नमन आहे .
हाती घेतलेले ग्रंथ रचनेचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ,मंगलाचरण हा शिष्ट उपचार आहे ,त्या परंपरेचे पालन करावे, श्रोतृ वर्ग आस्तिक व्हावा  हे या मागचे हेतू आहेत .
मंगलाच्या मुख्य देवता गणपती आणि सरस्वती आहेत .ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायापैकी अध्याय २ ,३ ,५ ,७ ,८ ,यांना नमने नाहीत
या नमनांचे ३ प्रकार आहेत .१ वस्तुनिर्देश रूप -ब्रम्हाचे रूप कथन करणे .
                                          २ आशीर्वादरूप -इच्छित वस्तू प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करणे .
                                           ३ नमस्क्रिया रूप -आपला नम्रपणा आणि ईश्वराची महानता दाखवणे .
या नमनामध्ये इतरही गोष्टी लिहल्या आहेत ,जसे श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपाप्रसादाची मागणी ,गुरुकृपेचे वर्णन ,गुरूस वारंवार वंदन तसेच गुरुशिष्य संबंधातली गोडी यांची वर्णने .आपली स्वताची आत्मा आणि जीव यासंबंधीची मते ते मांडतात .महाभारत गीता आणि महाकवी व्यासांची थोरवी ,अर्जुनाचे व्यक्तिचित्र ,श्रीकृष्णाचे अर्जुनप्रेम, श्रोत्यांची विनवणी , आपली गीतार्थ सांगण्याची महत्वाकांक्षा आणि मराठी भाषेचा अभिमान आणि तिची योग्यता हेही विषय आले आहेत .
अध्यायसंगती सांगण्यासाठी नमनाचा उपयोग केला आहे .जसे नववा अध्याय संपून दहावा सुरु होताना पूर्व कांड संपले असे म्हंटले आहे पहिल्या ९ अध्यायांचे विषय सांगून मग १० व्याचा विषय  सांगितला आहे .
ज्ञानेश्वरी हि गीतेवरील टीका आहे ,पण नमने हि त्यांच्या प्रतिभेचा स्वतंत्र अविष्कार आहेत म्हणून त्यांना महत्व आहे .यातून त्यांच्या सखोल शास्त्र अभ्यासाचे आणि गुरुभाक्तीचे दर्शन होते .ब्रम्हविध्या सर्वाना कळावी हि तळमळ व्यक्त होते .त्यांची शालीनता प्रकट होते .त्यांच्या अलौकिक बुद्धीचा आणि प्रतिभेचा प्रत्यय येतो .अध्यात्म आणि काव्य या दोन्ही दृष्टीने हि नमने असामान्य आहेत . 

Wednesday, November 23, 2011

rasmay dnyaneshwari

ज्ञानेश्वर हे थोर तत्वज्ञ असून अभिजात कवी होते उपनिशिदांचे रुक्ष निवेदन त्यांनी रसाळ काव्यरुपात मांडले .आपल्या काव्याबद्दल ते स्वतः म्हणतात
ऐका रसाळ पणाचीया लोभा |की श्रवणीची होती जीभा |
बोले इंद्रिया लागो कलाम्भा |एकमेका |अध्याय ६ओवि 16
या रसाळ पणाच्या लोभाने कानाला जीभा  उत्पन्न होतील आणि इंद्रियांमध्ये भांडण लागेल .
आपल्या ग्रंथात त्यांनी मानवी आयुष्याच्या संदर्भांनी ,गुरु -शिष्य ,वक्ता -श्रोता .अर्जुन -श्रीकृष्ण यांच्या प्रेमाच्या वर्णने माधुर्य आणले .त्यांची भक्ती भोळ्या अज्ञानाची नाही ,तर ती ज्ञानाच्या पायऱ्या चढत जाते ,आणि हे ज्ञान रुक्ष नाही तर ते समाजाभिमुख आहे .सर्व चराचर सृष्टीविषयी त्यांचे प्रेम पावलोपावली आपल्याला दिसते -या प्रेमामुळेच हे काव्य मधुर झाले आणि ज्ञानेश्वरांना "माउली "हि पदवी मिळाली
वाचे बरवे कवित्व |कवित्वी रसिकत्व |
रसिकत्वी परतत्व |स्पर्शू जैसा |अध्याय १८ श्लोक ३४७
जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे ,तसे कवित्व हे रसपूर्ण असावे ,आणि रसास परतत्वाचा स्पर्श असावा ,म्हणजेच ते जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारे असावे .सुरसता आणि माधुर्य हे गुण ग्रंथाची श्रोत्यांशी नाळ जोडतात .
ज्ञानेश्वरांच्या ग्रंथरचनेचा शांतरस हा प्रमुख भाव आहे .त्यांची प्रतिज्ञा आहे कि हा शांतरस शृंगाररसाला जिंकील .ज्ञानेश्वरांची हि काव्यकन्या आत्मरुपाची पतिव्रता आहे .शांत रसाबरोबर  येथे अद्भुत ,वीर ,रौद्र ,भयानक हे सर्व रस अनुभवास येतात .दृष्टांत देण्याच्या ओघात शृंगार रसही अत्यंत मनस्वीपणे अवतरला आहे . 
शृंगार वीर करून अद्भुत हास्य भयानक |
बीभत्स रौद्रो शांतश्च काव्ये नवरसा मतः |
  भरतमुनी नाट्यशास्त्र  श्लोक
 रसशास्त्र किंवा सौन्देर्य शास्त्र हे भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र .याचा संदर्भ नाट्य.संगीत ,साहित्य  या कलांशी येतो .
१ हास्य २ वीर ३ शृंगार ४ रौर्द्र ५ बीभत्स ६ करुणा ७ भयानक ८अद्भुत ९ शांत
श्री ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील नवरस या विषयावर साखरे महाराजांचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे

pachava ved

ओमकार हे अक्षर ब्रह्माचे  प्रतिक आहे .कारण ओम आणि अथः हे दोन्ही शब्द ब्रम्हदेवाच्या कंठातून प्रथम बाहेर आले .ब्रह्मतत्व हे नाम आणि रूप नसलेले आहे ,पण अज्ञानी जीवांना त्याच्याशी संवाद करता यावा श्रुतीने त्याला ओम हे नाव दिले
सर्व वर्णमाला हि ओंकारापासून निर्माण झाली .वेद हे ईश्वराचे श्वास आहेत .ऋषी हे वेदांचे फक्त प्रकाशक आहेत .वेद अपौरुषेय आहेत प्रत्येक चार युगानंतर कल्पांत होतो ,नवीन युगाच्या प्रारंभी वेद नव्याने प्रकट होतात ,ते नित्य म्हणजे कधी नष्ट न होणारे आहेत .
वेदातील बहुतेक भाग हा कर्म आणि उपसानापर आहे तात्विक महावाक्ये चार आहेत .वेदाच्या चार शाखांनी ब्रह्माच्या चार वेगवेगळ्या अंगाचे वर्णन केले आणि शेवटी ब्रम्हाच्या सत,चित ,आनंद या रूपाचे वर्णन केले .
या चार वेदात जे ज्ञान प्रकट झाले ,ते सामान्यांसाठी कृतीशील रुपात गीतेत प्रकट झाले ,म्हणून गीतेला पाचवा वेद म्हटले आहे .

dharma

धर्म हा आचार आणि विचार या दोन्हीचा मध्य साधतो .हिंदू धर्म हि एक कृतीशील परंपरा आहे .इथे केवळ तत्वज्ञानाची चर्चा करणारे अध्यात्म नाही तर त्याचे सर्वसामान्यांसाठी असणारे कृतीशील रूप आपण ज्ञानेश्वरीतून पाहणार आहोत .आपल्या जगण्यातील प्रत्येक कृतीला धर्माचे अधिष्ठान कसे द्यायचे हे ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते .म्हणून तिचे स्वरूप धर्मकीर्तनाचे    आहे .
काव्याच्या दृष्टीने विचार केला तर हि एक शांतीकथा आहे .काव्य आणि तत्वज्ञान येथे एकरूप झाले आहेत .
ज्ञानेश्वर अशी भूमिका घेतात कि मी संतांचा सामान्य जनासाठी निरोप घेऊन येणारा भारवाही आहे .आपल्या सगळ्याच्या मनात असलेल्या अर्जुनाचे धर्मविषयक शंकासमाधान इथे होते .जेंव्हाजेंव्हा निर्णय घेताना आपण
  अडतो तेंव्हा मार्ग दाखवणारी ज्ञानेश्वरी हे धर्माचे आचाररूप आहे .

Tuesday, November 22, 2011

dnyaneshwari ek dharmgranth

/आज ज्यांना आपण धर्मग्रंथ मानतो ती उपनिशिदे आणि भागवत आदि अठरा पुराने   यांचा काळ ५००० वर्षे इसवीसनाच्या आधी होता .तेंव्हा आर्य /अनार्य अशी विभागणी होती आणि हे आर्यांचे ग्रंथ होते .म्हणून गीतेत कुठल्याच धर्माचा उल्लेख नाही .त्याला वैदिक धर्म असे आज म्हणता येते .हिंदू धर्म हि संकल्पना नंतर दुसर्या शतकात  आली .पुढे बौद्ध धर्माचा भरभराटीचा काळ आला .आठव्या शतकात शंकराचार्यानी चार मठ स्थापन करून हिंदू धर्माचे पुनरुजीवन केले .बाराव्या शतकात श्री ज्ञानेश्वर झाले .
प्रस्थानत्रयी म्हणजे मृत्युनंतर मोक्षाला नेणारे ग्रंथ .परंपरेने वेद ,उपनिशिदे  ,आणि गीता हे ते तीन ग्रंथ मानले आहेत .भागवत धर्माने ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकारामगाथा हि प्रस्थानत्रयी मानली आहे .म्हणून ज्ञानेश्वरीला हिंदुधर्माच्या सर्वोच्च ग्रंथांच्या मालिकेत स्थान आहे .