Monday, April 30, 2012

adbhut nate krushnarjunache

श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने कृष्णार्जुन नात्यातले सारे पैलू हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत .
पाचव्या अध्यायातल्या अर्जुनाची भूमिका ही एका सुखासीन पण जीज्ञासुची भूमिका आहे .त्यला सत्य जाणून घेण्याचा मार्ग पालखीसारखा आरामदायी असावा असे वाटते .
देखे रोगा ते जिणावे ।औषध तरी ध्यावे ।परी ते अतिरुच्य व्हावे ।मधुर जैसे ।३ -१९ 
 रोग बरा करणारे औषधही मधुर असावे असे त्याला वाटते .ही वचने त्याची सुखासीनता दाखवतात .म्हणून त्याच्या मागणीनुसार भगवंत कठीण ज्ञानमार्ग अथवा योगमार्गापेक्षा सोप्या कर्मयोगावर भर देतात.अर्जुनालाही कर्म मार्ग सोपा वाटतो ,पण तो समजून घेण्यास आणि आचरणातआणण्यास  वेळ लागेल असे वाटते म्हणून तो श्रीकृष्णांना हा मार्ग सविस्तर सांगण्याची विनंती करतो .
एरव्ही तरी अवधारा ।जो दाविला तुम्हीअनुसारा ।तो पव्हण्याहून पाय उतारा ।सोहपा जैसा ।
तैसा सांख्याहून प्रांजाला ।परी आम्हा सारखिया अभोळा ।इथ आहाती कांही परी कला ।तो सांहो ये वर ।
सहज पहिले तर देवा ,तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पायउताराने जाणे सोपे ,तसा ज्ञान्मार्गाहून कर्मयोग सोपा ,आमच्या सारख्या दुर्बलांना येथे काही विलंब लागेल ,तो सहन करता येईल .
या सर्व संभाषणात भगवंताचे अर्जुनाविषयी मातेप्रमाणे प्रेम ,त्यांच्या स्नेहाचेअद्भुत पण याचे वर्णन करण्यात ज्ञानदेव रंगून जातात .
देखा कामधेनु ऐसी माये ।सदैव जया होये ।तो चंद्रुही परी लाहे ।खेळावाया ।
श्रीकृष्णांच्या अर्जुना विषयींच्या लोभास  कामधेनु ,कल्पवृक्ष अशी इच्छापूर्ती करणारी उपमा ते देतात .नंतर अशी माया लाभलेल्या अर्जुनाच्या भाग्याचे लोभस वर्णन करतात .स्वतः अर्जुन देवांना त्यांच्या या मायेबद्दल मन कवड्याचे राजे म्हणतो .
ते देखिलिया कृष्णे जान्नितले  ।मग हांसोनी पार्थाते म्हणितले।ते काई पा चित्त उवाइले ।ईये बोली तुझे ।
तंव अर्जुन म्हणे देवो ।परचित्तलक्षणांचा रावो ।भला जाणितला जी भावो ।मानसु  माझा ।५ -१६२ ,१६३ 
श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची स्थिती जाणली व मग हसून म्हणाले" आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का ? "यावर अर्जुन म्हणाला "देवा ,आपण मनकवद्याचे  राजे आहात .आपण माझ्या मनातला भाव चांगला ओळखलात .
यावर पुन्हा अर्जुनाचे कौतुक करताना श्रीकृष्ण म्हणतात 
अर्जुना तू परियसी ।परिसोनी अनुश्ठीशी ।तरी अम्हासीची वाणी कायसी ।सांगावयाची ।
अर्जुन ,तू चांगले ऐकतोस ,त्याप्रमाणेआचरनही करतोस ,तर आम्ही सांगावयास कमी का करू ?
यावेळी श्रीकृष्णांच्या अर्जुनाविषयी ममतेला जो पूर आला त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत असे ते म्हणतात .
हे बहु जे जे जल्पिजेल ।तेथे कथेसी फांकू होईल ।परी ते स्नेह रुप नयेल ।बोलवरी ।५ -१७३ 
अशा रीतीने अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या श्रीकृष्णांच्या दृष्टीचे वर्णन करण्यास साक्षात श्री ज्ञानेश्वरांना शब्द तोकडे पडतात -तर आपण पामरे त्याचे काय वर्णन करू शकणार ?

Sunday, April 29, 2012

aham mukti

पाचव्या अध्यायातला दुसरा सिद्धांत आहे अहं मुक्तीचा .
तैसा कर्तृत्वाचा मदु ।आणि कर्मफलाचाआस्वाडू ।
या दोन्हीचे नाव बंधू ।कर्माचा किं ।अ १८ ओ २०५ 
कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची अपेक्षा या दोन्हीचे नाव कर्माचा बंध आहे .मी करता ,मी भोक्ता हा अहंकार दूर झाला की सर्व कर्मे करूनही तो अकर्ताच राहतो म्हणून हा जो कर्मयोगी तोच संन्यासी .
या योगी पुरुषाच्या सर्व व्यापाराचे वर्णन श्री ज्ञानदेवांनी फार समर्पक उपमा देऊन केले आहे .
दीपाचेनि प्रकाशे ।गृहीचे व्यापार जैसे ।देहिन कर्मजात तैसे ।योगयुक्त ।५ ओवी ४९ 
आत्मज्ञानाच्या दीपाच्या प्रकाशात योग्याचे सर्व व्यापार सुरु असतात ,पण केवळ साक्षीपणे ,तो कर्माच्या बंधनात सापडत नाही ,म्हणून त्याच्या परिणामातून हि मुक्त होतो ,मग त्याच्या या सर्व क्रिया ह्या अक्रीया होतात ,म्हणून हा जसा कर्मयोगी तसाच संन्यासी .
अशा योग्याच्या कर्माचे वर्णन करताना ते म्हणतात 
आता करता ,कर्म करावे ।हे खुंटते त्या स्वभावे ।आणि करी जरी आघवे ।तरही  अकर्ता  तो ।
करता, कर्म आणि क्रिया ही त्रिपुटी त्याच्याबाबत संपते ,म्हणून हे कर्म निष्कर्म होते .कर्म हा प्रकृतीचा अटल पसारा आहे -आत्म रूपाचे या पसार्याशी  काही देणेघेणे नाही ,हे तो जाणतो म्हणून तो फल ब्रह्मार्पण करतो ,त्यामुळे त्या कर्माचा दोष त्याला चिकटत नाही .अशाप्रकारे कर्मयोग्याचे कर्म हे करितेविन कर्म ,म्हणजेच नैष्कर्म्य आहे ,कारण तो जाणतो की त्याच्या आत्म रूपाचे या प्रकृतीजन्या  कर्माशी काही देणेघेणे नाही ,म्हणून त्याने स्वतःला फळ हेतूपासून तोडलेले असते ,हेच योग तत्व पाचव्या अध्यायात श्री ज्ञानेश्वरांनी गव्हारले आहे .

Saturday, April 21, 2012

yog garbh

दहाव्या अध्यायाच्या प्रारंभी आढावा घेताना श्री ज्ञानदेव म्हणतात -पंचमी गव्हारले ।योग तत्व ।म्हणजे पाचव्या अध्यायात योगाचे गूढ तत्व स्पष्ट केले आहे ,म्हणून या अध्यायास योग गर्भ हे नाव दिले आहे .
पाचव्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन विचारतो कि सन्यास आणि योग यातला श्रेयस्कर मार्ग कोणता हे सांगा .
उत्तर देताना भगवंत पहिला सिद्धांत सांगतात कि ज्ञान म्हणजेच  संन्यास  आणि योग हे अंतिमतः एकच आहेत .कारण दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत .पण ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्यास नाव हे सुलभ साधन आहे ,त्याप्रमाणे सर्वांसाठी निष्काम कर्मयोग हा भवसागर तरून जाण्यास सोपे साधन आहे .जो कोणाचा द्वेष करत नाही व कशाची इच्छा धरत नाही असा कर्मयोगी हा संन्यासीच जाणावा .त्याच्या अन्तः करणामध्ये मी व माझे याचे स्मरणच राहिले नाही तो संन्यासीच होय .अशा स्थितीत घर ,संसार वगैरेचा त्याग करण्याची जरूर राहत नाही ,कारण या सगळ्याकडे ओढले जाणारे त्याचे मनच निःसंग झाले असते .विस्तव विझून गेल्यावर ज्याप्रमाणे राखेचा गोळा कापसात गुंडाळून ठेवला तरी कापूस पेटत नाही ,त्याप्रमाणे ज्याचे मन अंतरात्म्यापाशी   स्थिर झाले त्याला प्रपंच गुंतवू शकत नाही .
जो स्वतःला ओळखतो तो स्वाभाविकच "मी देह नव्हे ,तर सतत स्फुरण पावणारे आत्म तत्व म्हणजे मी "हे जाणतो ,त्यामुळे त्याचे मनही शरीर ,मन, बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या  संकल्पापासून  मुक्त होते .आणि तो जीव स्वतःच ब्रह्म रूप होतो .अशावेळी हा निष्काम कर्मयोगी हा कर्म करूनही कर्माचा त्याग करणारा संन्यासी असल्याप्रमाणे होतो ..म्हणून ज्ञानमार्गाने कर्म त्याग केलेला संन्यासी व निष्काम कर्मयोगी हे एकच आहेत .
तयासींची जगी पाहले ।आपणपे तेणे देखिले ।ज्या सांख्य योग जाणवले ।भेदेवीन ।३१ अ ५ 
ज्याला सांख्य आणि कर्मयोग यात भेद नाही हे जाणवले ,त्यालाच जगात ज्ञान दिसले ,त्यानेच आत्म रूप पहिले .
दिव्याच्या उजेडात घरातील सर्व कर्मे होतात ,पण दिवा स्वतः काही करत नाही ,त्याप्रमाणे ज्ञानाच्या उजेडात देहातील सर्व कर्मे होतात ,पण कर्मफल त्या कर्मयोग्यास बाधत   नाही .कमळाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही ,त्याप्रमाणे तो संसारात असून कर्माच्या बंधनात सापडत नाही ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते .त्याप्रमाणे योगी केवळ शरीराने कर्म करतात ,त्यामागे हेतू व फळाची अपेक्षा नसते .कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले कर्म हे कर्मसंन्यासाच्या  सारखेच होय .जे बुद्धीला प्राप्त करण्यास कठीण आणि मनाला आकलन करण्यास अवघड असे हे ज्ञान भगवंतानी अर्जुनास सांगितले .

Wednesday, April 18, 2012

krutarthpurush dnyaneshwar

भगवंत कृतार्थ पुरुषाची व्याख्या सांगतात 
कर्मण्या कर्म य :पश्येद कर्मणी च कर्मय :।स बुद्धिमान मनुष्येसू स युक्तः कृत्स्नकर्मकृत ।१८ अ ४ 
कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो व अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो ,तो मनुष्यामध्ये बुद्धिमान ,योगी ,सर्व कर्मकर्ता  जाणावा .
या कल्पनेचा विस्तार करताना श्री ज्ञानदेव म्हणतात ,सर्व कर्मांचे आचरण करत असताना जो आपण खरोखर कर्म करत नाही हे जाणतो आणि कर्म फळाची आशा धरत नाही ,तो ज्ञानी होय .तो दिसताना सामान्य माणसासारखा दिसतो ,पण तो इंद्रियांच्या अधीन नसतो .तो स्वतः विश्व रूप असतो ,मी आणि हे जग त्यासाठी वेगळे नसते .त्याच्या ठिकाणी कर्माचा तिरस्कार नसतो ,पण फळाची आशाही नसते . हे कर्म मी करीन अथवा आरंभलेले पुरे करीन ह्या कल्पनाही त्याच्या मनात येत नाहीत ..
ज्ञानरूपी अग्निद्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रम्हच आहे 
व्यक्त्वा कर्मफलासंग नित्य तृप्तो निराश्रयः ।कार्माण्याभी प्रवृत्तोपी नैव किंचित करोति सह ।२० 
कर्म फळाची आसक्ती सोडून नित्य तृप्त आणि निराश्रय झालेला मनुष्य लोक दृष्टीने कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झालेला दिसत असला तरी वास्तविक तो काही करत नाही .तो शरीराविषयी उदास असतो ,फळाच्या उपभोग विषयी निरिच्छ असतो ,तो नेहमीच आनंदरूप होऊन राहिलेला असतो ,तो संतोषाच्या गाभार्यात जेवत असताना आत्म्बोधाच्या  पक्वान्नाला  पुरे म्हणत नाही .
 इच्छारहित ,चित्त आणि शरीर -इंद्रिये संधान यांचे पूर्ण नियमन केलेला ,सर्व उपाधीचा त्याग केलेला ,तो शारीरिक कर्म करत असताना देखील कर्मफळ त्यास बाधत  नाही .अहंकार आणि आशा  यांचा त्याने सर्वथा त्याग करूनपरम आनंदात  केवळ रुची ठेवली असते ज्यावेळी जे मिळेल त्यात तो संतुष्ट असतो .त्याला आपले आणि परके नसतात ,हे विश्वच  त्याला आपल्याहून  वेगळे भासत नाही .तो देहधारी असला तरी निर्गुणचैतन्न्या सारखा दिसतो .त्याने केलेली यज्ञादिक कर्मे त्याच्याच ठिकाणी लय  पावतात ,म्हणून कर्म ब्रम्ह आहे असे साम्य त्याच्या प्रतीतीला आल्याने त्याने कर्तव्य कर्म केले तरी ते नैष्कर्म्य  होय .
श्री ज्ञानेश्वरांचे स्वतःचे परिपूर्ण आयुष्य म्हणजे कृतार्थ पुरुषाचे मूर्तिमंत उदाहरण होय .
ते सर्व सजीव आणि निर्जीवांमध्ये स्वतःला पाहत होते याची प्रचीती त्यांनी रेड्यामुखी वेद वदवून आणि भिंत चालवून दिली .
श्री ज्ञानदेवांच्या सदेह असण्याच्या काळात समाजाने त्यांना नाना प्रकारच्या अवहेलनाना सामोरे जावयास लावले -परंतु ते आत्मज्ञानाने सदैव आनंदरूप असल्याने या सर्व संकटांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होऊ शकला नाही .त्यांनी समाजाच्या भल्यासाठी जे ग्रंथ लेखन केले ते करताना सुरवात व शेवट याविषयी कोणतेही संकल्प केले नाहीत ,तरीही पूर्ण आत्मविश्वासाने हे ग्रंथलेखन पूर्ण केले ,कारण ते कर्माच्या बंधनात अडकले नव्हते .
लहान वयातही त्यांच्या  लेखनात लौकिक जगातील सर्व अनुभव ,मानवी भावनांचे कल्लोळ ,वेगवेगळ्या भौगोलिक जागांचे संदर्भ हे सर्व येताना बघितल्यावर पटते की त्यांनी काही न करता सर्व केल्याप्रमाणे आणि कशाचाही उपभोग न घेता ते भोगल्याप्रमाणे आहेत .
आपल्या सर्व लेखनाचे श्रेय ते वारंवार आपले गुरु आणि श्रोते तसेच संतकृपा यांना देतात ,तेंव्हा त्यांनी आपण आणि हे विश्व यातील भेद नष्ट केला आहे ,ते विश्व रूप झाले आहेत हे पटते
स्वतःचे वैयक्तिक मानवी आयुष्य जगताना कोणत्याही मानवी लौकिक गोष्टींची आस नसताना केवळ समाजाच्या भल्यासाठी त्यांनी जो ग्रंथ यज्ञ आरंभिला आणि ज्ञान हे समाजाभिमुख करण्याची तळमळ  दाखविली ,हे त्यांच्या निष्काम कर्म वृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण होय .

Wednesday, April 11, 2012

granth dnyaneshwari -shantras

चौथ्या अध्यायाच्या शेवटी उपसंहार रूप गीतेत नसलेले ,पणज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने प्रकट झालेले जे श्लोक आहेत ,ते ज्ञानेश्वरीची थोरवी वर्णन करतात .
तो शान्तूची अभिनवेल ।ते परियसा मरहात्ते  बोल ।
जे समुद्राहून खोल ।अर्थ भरीत ।२१४
 तोशांतरसच ज्यात अपूर्वतेने  प्रकटेल ,जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षा गंभीर आहेत ,ते मराठी बोल ऐका .
ज्ञानेश्वरीचे वर्णन ते भावाची संपत्ती ,रसाची उन्नत्ती  असे करतात .पण सारे आठ रस यात प्रकट झाले असले तरी शांत रसच विशेष अपूर्वतेने प्रकटेल असे ते म्हणतात .शांत रस हा या जगी  सज्जनांच्या बुद्धीचे विश्रामस्थान आहे ,त्याच्या चांगलेपणावरून बाकीचे रस ओवाळून टाकावेत.याचे मराठी बोल हे अर्थाने समुद्राहून गंभीर आहेत अशी ते सूचना देतात .परत एकदा सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे या शब्दांच्या अर्थाची व्याप्ती अमर्याद आहे असेही वर्णन करतात .या शब्दांचे सामर्थ्य वर्णन करताना ते त्यांना कल्पवृक्षाची उपमा देतात ,इच्छा करणारांचे सारे संकल्प तो पुरे करील असे सांगतात .
जेथ साहित्य आणि शांती ।हे रेखा दिसे बोलती ।
एख्याद्या लावण्यगुणवतीने पतिव्रता असावे ,याप्रमाणे या शांत रसाला अलंकारांची जोड मिळाली आहे हे सांगताना ते "रेखा "हा शब्द "शब्दकला "या अर्थी वापरतात .मराठे या शब्दाचा अर्थ मराठी भाषा ,तसेच कानडे  विरुध्द मराठे म्हणजे "सुबोध "या अर्थी पण वापरतात
आपली हि कथा अवधान पूर्वक निके (पूर्ण )चित्त देवून ऐकावी असे ते श्रोत्यांना आवाहन करतात ,पण ते करताना यात साखरेची गोडी ,मलय पर्वतावरील सुगंध ,सुमधुर स्वर ,आणि वार्याचा चा शरीर शांत करणारा स्पर्श असे अनुभूतीच्या सर्व मार्गांनी हि कथा तुम्हाला सुखवील असे आश्वासन देतात .
या कथेच्या ऐकण्याने कानाचे पारणे तरफिटेल ,पण संसार दुखाचे समूळ उच्चाटन होईल ,मनाला न मारता ,इंद्रियांना दुख न देता येथे नुसते ऐकण्याने मोक्ष मिळेल म्हणून प्रसन्न मानाने हा गीतार्थ ऐका असे ते आवाहन करतात .
अतींद्रिय परी भोगवीन ।इंद्रिय करवी ।
या त्यांच्या प्रतिज्ञेची पुरती करताना ते शब्द ,रूप ,रस ,गंध ,स्पर्श या इंद्रिय संवेदनाचा याश्रवणसुखाशी संबंध जोडतात .
आता शांतरसाचे भरीते ।सांडीत आहे पात्राते ।ते बोलणे बोलापरीते ।बोलविले ।
शांत रसाच्या नदीचा  काठ ओलांडून पलीकडे वाहतो आहे ,अशा वेळी बोलणे हे अशांत आहे ,पण स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना जे बोलू नये ते मी बोललो असे ते म्हणतात .
शांत हा ज्ञानेश्वरीतील प्रधान रस आहे .व आत्मज्ञान हा शांत रसाचा स्थायी भाव आहे .ज्ञानेश्वरी हे आत्म ज्ञानाचेच विवेचन असल्याने शांतरस हा या ग्रंथाचा प्रमुख रस ठरतो .एकूणच या ग्रंथात साहित्य म्हणजे नादमधुर शब्द संपत्ती व शांतरस यांचा ज्ञानेन्द्रीयाना सुखावणारा मधुर मिलाप आहे .
पूर्ण ग्रंथात ज्यांना आत्म बोधाचे ज्ञान झाले आहे अशा स्थितप्रद्न्य ,ज्ञानी ,,योगी भक्त ,गुणातीत  ,संत यांची वर्णने येतात ती शांत रसाचा पूर्ण अविष्कार आहेत .ही वर्णने वाचताना आपल्याला होणारी आत्म तत्वाची आनंदमय जाणीव हाच शांत रसाचा अनुभव होय .
मोह्ग्रस्तता ते मोहमुक्तता हा अर्जुनाचा प्रवास या शान्तिकथेचा गाभा आहे .याचे स्वरूप धर्म कीर्तनाचे आहे ,पण काव्याच्या अंगाने ही शांतीकथा आहे .काव्य आणि तत्वज्ञान यांचे एकात्म असे हे रूप आहे 


Monday, April 9, 2012

karm,akarm,vikarm,naishkarmy

वेद श्रुतींनी मोक्ष प्राप्तीसाठी कर्म ,उपासना ,ज्ञान हि साधने अधिकारानुसार सांगितली आहेत ,बहुतेक लोक हे कर्माधिकारी  असतात .हे कर्म मोक्ष दायी होण्यासाठी ते ईश्वर समर्पण बुद्धीने करावे लागते हि गोष्ट भगवंतानी चौथ्या अध्यायात अधिक स्पष्ट करून सांगितली आहे .
गीतेतील कर्म हे साध्य  नाही तर ते ईश्वराची कर्म कुसुमानि पूजा करून त्यासप्रसन्न  करून घेण्याचेसाधन आहे .गीतेने जी साधना सांगितली तिचा कर्मयोग हा पाया तर ज्ञानयोग हे शिखर आहे .कर्मयोग हा अंतकरणशुद्धी द्वारा ज्ञानयोगास साधनभूत आहे ,आणि ज्ञानयोग मोक्ष दायक आहे .पूर्वी जनक आदि राजापर्यंत ज्ञात असलेले हे ज्ञान काळाच्या ओघात नाहीसे झाले होते ,ते आता मी तू माझा सखा भक्त असल्यामुळे तुला सांगत आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात .
यथार्थपणे कर्मशास्त्र समजण्यासाठी कर्म ,अकर्म आणि विकर्म हे तीन प्रकार समजले पाहिजेत कर्म अकर्माचा विचार करताना ज्ञान्यानाही भ्रम होतो कारण कर्माचे योग्य असणे हे कर्त्याचा वर्ण ,आश्रम ,परिस्थिती ,काळवेळ यावर अवलंबून आहे .
कर्म याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी सामान्य कर्म -सृष्टी उत्पादक व्यापार असा केला आहे .
विकर्म याचा अर्थ वर्ण आश्रम यानुसार कर्तव्य असे कर्म  .
अकर्म याचा ज्ञानेश्वरांनी निशिध्ह कर्म असा अर्थ केला आहे .शास्त्राने जे कधीही करू नये असे सांगितले आहे ते ,ब्रम्हहत्या ,सुरापान ,चोरी ,परदारागमन  इत्यादी .
 त्याज्य कर्म कोणते हे कळण्या करता आधी विहित कर्म समजून घ्यावे लागते .
तरी कर्म म्हणजे स्वभावे ।जेणे विश्वाकारु संभवे ।ते सम्यक आधी जाणावे लागे येथ ।८५
येथे कर्माचा विचार अधिक व्यापक केला आहे .या सर्व विश्वाला आदिकारण जो आदिसंकल्प त्यास इथे कर्म म्हटले आहे .कर्म म्हणजे ईश्वराचे मायारूप आद्यस्पंदन  .
मग वर्णाश्रमासि उचित ।जे विशेष विहित कर्म ।तेंही ओळखावे निश्चित ।उपयोगेसी ।९०
वर्ण आणि आश्रम यांना अनुसरून योग्य म्हणून शास्त्राने सांगितलेले विशिष्ट कर्म -विहित कर्म म्हणजेच विकर्म होय.हे कर्ममाणसाचे ऐहिक व पारलौकिक कल्याण करून देणारे आहे ,म्हणून ते विधीपूर्वक ,सावधपणे आचरले पाहिजे असे ते सांगतात
इथआणिक हि एक अर्जुना ।हे कर्म अकर्म विवंचना ।आपुलिया चाडे सज्ञाना ।योग्य नोहे ।८४
भगवान म्हणतात की ही कर्म व अकर्माची  निवड  ज्ञानी माणसालाही स्वताच्या इच्छेने करता येत नाही -याचा निर्णय शास्त्रोक्त व सारासार विचाराने घ्यावा .
कर्मे करत असतानाही कर्तृत्वाचा अहंकार आणि फळाची आसक्ती सोडली तर ती कर्मे बाधक होत नाहीत -म्हणून अशा भावनेने कर्म करणे ही खरी युक्ती होय .गीतेतला निष्काम कर्मयोग तो हाच .
नैष्कर्म्य
मनाने इंद्रियांचे नियमन करून फलाशा न ठेवता केवळ कर्मे इंद्रीयाद्वारा करणे म्हणजे नैष्कर्म्य होय .
याचे उदाहरण  देताना भगवंत म्हणतात :सूर्य उदय व अस्त पावतो ,यावरून तो चालतो असे भासते ,वास्तविक तो चालत नाही ,याप्रमाणे जो कर्माचरण करतानाही अलिप्त राहतो तो नैष्कर्म्य करणे जाणतो .नावेत बसून जाणार्या माणसाला किनार्यावरील झाडे चालत आहेत असे दिसते ,पण वास्तविक नाव चालत असून झाडे स्थिर आहेत हे जो जाणतो , त्याप्रमाणे कर्मेद्रीयाद्वारा कर्म करताना ज्याचे मन आणि बुद्धी भगवंत चरणी स्थिर आहे तो निष्काम योगी .कर्म सन्यास याचा अर्थ सर्व कर्मे टाकून देणे असा नसून फलेच्छा रहित बुद्धीने कर्म हे ब्रम्हच आहे हे जाणून  बाह्यतः कर्म करूनही अंतकरणी निष्काम राहणे असा आहे या रीतीने जो आपली कर्तव्ये मात्र तत्परतेने करतो तो ज्ञानी ,मनुष्य रूपातील साक्षात ब्रह्मच होय
अनिष्ट ,इष्ट व मिश्र अशी कर्माची तीन फळे आहेत .जड सृष्टी व पशुपक्षी योनी हे अनिष्ट फल होय ,मनुष्य जन्म हे मिश्र फल ,तर स्वर्गात देवांचे जन्म लाभणे हे इष्ट फल ,अशा तर्हेने त्रिविध जग हे कर्माचे फल आहे आणि ब्रम्हाशी  एकरूप होणे हीच मुक्ती होय .
मागील मुमुक्षु जे होते ।तीही ऐशियाची जाणून माते ।कर्मे केली समस्ते ।धनुर्धरा ।
परी ते बीजे जैसी दग्धली ।नुगवतीच पेरिली ।तैशी कर्मेच परी त्या झली ।मोक्ष हेतू ।८२ ,८३
पूर्वी जे ज्ञानाचे अधिकारी मोक्ष मार्गी होते त्यांनी माझे मुल रूप जणून सर्व कर्मे केली ,परंतु भाजलेले बी ज्याप्रमाणे उगवत नाही ,त्याप्रमाणे त्यांच्या  निष्काम रीतीने त्यांना त्या कर्माचे फल न लागता मोक्ष प्राप्त झाला.
कर्मास कारण देह ,पाच ज्ञानेंद्रिये. मन .बुद्धी ,पंच कर्मेंद्रिये हे आहेत .आत्मरूप मी हा कर्मास कारण नाही .म्हणून शरीर माध्यमातून क्रिया घडत असल्या तरी आत्मा निर्लेप असतो ,हे ज्ञान  प्रत्यक्ष कृतीत आणणे  हा खरा निष्काम कर्मयोग .

Thursday, April 5, 2012

kam,krodh,lobh,mad ,moh ,matsar -shadripu

निष्काम कर्मयोगाच्या आचरणात येणारे धोके सांगताना श्री भगवान म्हणतात कि प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात .इंद्रीयांपासून मिळणाऱ्या सुखसंवेदनेमुळे लोक विषयांच्या ठिकाणी मोहवश होतात आणि म्हणून कर्माच्या परिणामात सापडतात .जे लोक इंद्रियांचे लाड करतात ,त्यांना विषयरूपी विषाची बाधा होते ,ते अज्ञान रुपी चिखलात फसतात .इंद्रियांना पाहिजे तो विषय देत गेले तर मनाला संतोष होतो ,पण काम आणि त्याच्या परिणामी क्रोध हे घात करणारे आहेत ,म्हणून त्यांची मनास  ओढ लागू देऊ नकोस .
यावेळी अर्जुनाने विचारले कि असे आहे तर ज्यांना सगळे कळते असे ज्ञानी पुरुष ही कोणत्या प्रेरणेने चुकीच्या मार्गाने जातात ?
याचे उत्तर देताना भगवंत म्हणतात कि ज्ञानी पुरुषांना स्वताच्या इच्छे विरुध्द पापाचरण करायला लावणारे काम ,क्रोध ,मोह हे वैरी आहेत .हे असे आहेत कि यांच्या मनात दया नाही ,हे जणू प्रत्यक्ष यम धर्मच आहेत ,हे मुळात रजोगुण पासून बनले आहेत ,पण ते तमोगुणाला फार प्रिय आहेत .यांचे अविवेकाच्या रूपाने जगावर राज्य आहे .हे जीविताचे शत्रू असल्याने मृत्यूचे मित्र आहेत ,या काम ,क्रोधाच्या विनाशकारी व्यापारात आशा  ,भ्रांती आणि तृष्णा या सहाय्यकारी आहेत .यांच्या व्यापाराला जगही पुरे पडत नाही .यांना मोहाच्या घरी मनाचे स्थान आहे आणि त्यांची अहंकाराशी देवघेव आहे .अहंकार आपल्या पोटी सर्व जगास नाचवतो आणि दंभहि यांनीच जगात पुढे आणला .
या विषयांच्या सैन्याने मायेचा व्यवहार वाढतो .शांती ,विचार ,संतोष ,वैराग्य ,निग्रह ,आनंद ,बोध या सर्वाना ते लांब पळवून लावतात .हे कामक्रोध जीवात्म्या जवळच असतात ,शरीराबरोबर उत्त्पन्न होतात आणि अंतकरणास चिकटून राहतात .यांचे बल  असे की हे पाण्यावाचून बुडवतात ,अग्नीवाचून जाळतात  शास्त्र   वाचून ठार करतात ,जाल्यावाचून अडकवतात . हे अंत करणाच्या फार जवळ असल्याने कोणास ही आटोक्यातआणता  येत नाहीत .
काम,क्रोध ,मोहाचे वर्णन करताना श्री ज्ञानदेवांनी काही दृष्टांत दिले आहेत .ते म्हणतात कि ज्याप्रमाणे धुराने अग्नी ,मळाने आरसा आणि वेष्टणाने गर्भ अच्छादलेला असतो त्याप्रमाणे कामाने ज्ञानास आच्छादले  आहे .जसे चंदनाच्या मुलाला साप वेढे घालून बसतो ,तसे हे ज्ञानास कवटाळून बसतात .
ज्याप्रमाणे बी कोंड्या वाचून उत्पन्न होत नाही ,त्यप्रमाणे ज्ञान कधी काम क्रोध मोहवाचून उत्पन्न होत नाही .स्वभावतः ज्ञान निर्लेप आहे ,पण काम क्रोधाच्या आच्छादनामुळे ते प्राप्त करण्यास कठीण आहे .इंद्रिये ,मन आणि बुद्धी ही यांची आश्रयस्थाने  आहेत .,म्हणून अगोदर इंद्रिये ,मन ,बुद्धी यावर स्वबळाने ताबा मिळवावा लागतो ,तेंव्हाच  ज्ञान प्राप्त होऊ शकते .
मग मनाची  धांव पारुषेल ।आणि बुद्धीची सोडवण होईल ।एतुकेनी थारा मोडेल ।या पापियांचा ।२६९
मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल .एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल .
इंद्रीयांपेक्षा मन  श्रेष्ठ ,मनापेक्षा बुद्धी व बुद्धीपेक्षा काम श्रेष्ठ ,म्हणून ब्रह्म प्राप्तीसाठी हे अर्जुना तू इंद्रियांचे नियमन करून ,मनावर संयमाचे राज्य आणून मोकळ्या बुद्धीने कामास जिंकून घे .तरच तू ज्ञानप्राप्तीस योग्य होशील .

Tuesday, April 3, 2012

arjun tisrya adhyayatla

तिसर्या अध्यायाला प्रारंभ होतो अर्जुनाच्या प्रश्नाने
हे भगवंता ,तू मला ज्ञान निष्ठा सांगितलीस ,कर्म निष्ठाही सांगितलीस -मी नेमके काय करायच्र ?तू मला गोंधळात टाकतो आहेस .तुझ बोलणे व्यामिश्र आहे ,तेंव्हा    निश्चित सांग  की ज्ञान मार्गाने जाऊन संन्यास पत्करू की कर्म मार्गाने जाऊन युद्ध करू ?
त्याचवेळी ज्ञानेश्वरांचा अर्जुन मनात म्हणतो ,बरे झाले ,तूच सांगतोस कर्म नको ,संन्यास मार्ग ,ज्ञान मार्ग चांगला आहे ,आता मी नाहीच युद्ध करत .हे अनंता ,तू जर म्हणतोस की कर्म आणि करता हे उरतच नाहीत ,तर मग मला युध्धासारख्या घोर कर्मात का घालतोस ?तूच सर्व कर्मांचा निषेध करतोस ,आणि मजकडून हे हिंसात्मक कृत्यकरून घेतोस ? याचा मेल कसा घालावा ?अविवेकी अर्जुन संभ्रमामुळे भगवंताना "तुला लाज वाटत नाही काय ?"असेही म्हणतो .उपहासाने तो म्हणतो की तूच असे बोलल्यावर सारासार विचार या जगातून नाहीसा झाला असे म्हणावे ;आमचीआत्म बोधाची इच्छा तू चांगलीच पुरवलीस म्हणायची .   चिडून अर्जुन भगवंतास रोग्याला विष देणाऱ्या वैद्याची उपमा देतो आणि उपहासाने सांगतो कि आधीच मर्कट ,तशात मद्य प्याले तशी तुझ्या उपदेशाने आमची स्थिती झाली आहे .यानंतर निराश अर्जुन कळवळून विचारतो कि तुझ्या उपदेशाप्रमाणे वागनार्याशी तू असे वागावे का ?तो हताश होऊन विचार करतो की आता याचेकडून ज्ञान मिळवण्याचीआशा  तर संपलीच,पण माझे स्थिर असलेले मनही गडबडले .
तो पुन्हा भगवंताना शरण जाऊन विनंती करतो की मला समजेल असा हा उपदेश सोपा पण निश्चयात्मक करून सांगा .भगवंतांची स्तुती करताना तो त्यांच्यासारख्या गुरुकडून आपल्या ईछेच्या  तृप्तीची हक्काने मागणी करतो  .त्यांना चिंतामणीची ,कामधेनूची ,अमृताच्या समुद्राची उपमा देतो ,लहान मुलाने वेळीअवेळी आईकडे स्तनपान मागावे त्याप्रमाणे  मी तुम्हाला मागत आहे असे म्हणून त्यांच्या ममतेला साद घालतो
या अर्जुनाच्या भाव भावनाच्या खेळणे श्रीकृष्ण चकित झाले .त्यांनी त्यास सांगितले कि कर्त्याच्या योग्यतेवर कोणता मार्ग हे अवलंबून आहे ,म्हणून अर्जुना तुझ्यासाठी निष्काम कर्मयोगच योग्य आहे अशा रितीने भगवंतानी अर्जुनाला भ्रमातून हळूहळू बाहेर काढून त्याचे मन निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी स्थिर केले .

  

Monday, April 2, 2012

karmyog

गीतेने ब्रह्म प्राप्तीचे दोन मार्ग सांगितले आहेत .१ज्ञान मार्ग २कर्म योग .हे दोन्ही मार्ग एकाच ईश्वरा पर्यंत पोहोचवतात .
तिसरा अध्याय म्हणजे गीतेवरील धर्म कीर्तनाचा प्रारंभ .मानवी जीवन ही एक अखंड कर्म यात्राच.अज्ञानी जीवांना मोक्षपद मिळण्याची योग्यता येण्यासाठी गीतेने कर्म उपासनेचा मार्ग सांगितला .कर्मयोगाचे निरुपण दुसर्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत पुन्ह पुन्ह प्रकटते .
प्रत्येक सजीवात असलेले प्रकृतिजन्य गुण त्याच्याकडून कर्म घडवत असतात. जो कर्म टाळून मनात मात्र विषयांचे चिंतन करतो त्यास दांभिक म्हणतात .पण जो मनाने  इंद्रियांचे नियमन करून ,विषयासक्ती सोडून कर्म करतो तो योगी होय .तो इंद्रियांना हुकुम करत नाही ,विषय त्याला बाधत  नाहीत ,तो विहित कार्याचा अनादर करत नाही ,पण कर्मापासून निर्माण होणारे विकार त्याला चिकटत नाहीत ,म्हणून तो दिसताना सामान्य माणसा प्रमाणे कर्म मग्न दिसतो .
जे जे करण्यायोग्य आणि प्रसंगानुरूप कर्म आहे ते फळाची आशा सोडून करावे ,मग ते कर्म जीवाला बांधत नाही
ब्रह्मदेवाने प्रजेला सांगितले की तुम्ही फक्त स्वधर्माचरण करा ,मग दुसरी व्रते ,नियम याची जरूर नाही ,शरीराला पिडा देणे ,तीर्थयात्रा करणे जरूर नाही ,मंत्र तंत्र ,योग याचीही गरज नाही .सर्वथा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म केल्याने मोक्ष मिळतो .,आत्मज्ञानाची प्राप्ती होते
श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात ,लोक त्याचे अनुकरण करतात ,म्हणून अशा मोक्ष प्राप्त पुरुषाने समाजात राहून आपली विहित कर्मे अनुसरत राहावी लागतात ,म्हणून समर्थ पुरुषाने कर्मत्याग करू नये .
अहंकारी पुरुष प्रकृतीच्या गुणाने होणार्या कर्मांचा मीच करता असे मानतो .असे म्हणतात की इंद्रिये श्रेष्ठ आहेत ,पण त्यांच्यापेक्षा मन श्रेष्ठ ,मनापेक्षा बुद्धी ,बुध्धीपेक्षा काम श्रेष्ठ ,म्हणून मन आणि बुद्धी यांना एकत्र येऊन कामाला जिंकावे लागते काम हा इंद्रिये ,मन ,बुद्धी यांच्या आश्रयाने ज्ञानाला झाकतो ,म्हणून अगोदर इंद्रिये ,मन ,बुद्धी यांचे नियमन करून काम ,क्रोध ,लोभ ,मद, मोह ,मत्सर या सहा शत्रूंचा नाश करावा ,आणि मग कर्म करावे .