गीतेचे महत्व वर्णन करताना भगवंत म्हणतात ,गीतेतील ज्ञान ही केवळ सर्व शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होणारी वस्तू आहे .ती उपनिषद रुपी कमळातील सुगंध आहे. व्यासांच्या बुद्धिरूप रवीने हे अनादिसिध्द लोणी भगवंतानी काढले आहे .गीता ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे .विचार रुपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली ही दुसरी लक्ष्मी आहे .तिने आपले सर्वस्व म्हणजे पद ,वर्ण ,अर्थ वगैरे एका पुरुषोत्तमास अर्पण .केले गीता हे संसार जिंकणारे शास्त्र आहे .तिची अक्षरे हे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत .भगवंत म्हणजे चैतन्य रुपी शंकर ,त्यांच्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता ,तो बाहेर काढणारा ,श्रद्धेचे भांडार जो अर्जुन ,तो भगीरथ झाला .व म्हणून अर्जुन स्वतःच गीतेसह भगवंताचे राहण्याचे ठिकाण झाला .भगवंत म्हणतात कि ही ज्ञानाची वेळ गीता ,हिला जो जाणेल त्याचा मोह नाहीसा होईल ,त्याला आत्मज्ञान होईल ,आत्मस्वरूपी एकरूप होता येईल .
Tuesday, September 11, 2012
ashwatth vruksh
पंधराव्या अध्यायात संसाराचे मिथ्यारूप दाखवण्यासाठी भगवंतानी अश्वत्थ वृक्षाच्या महारुपकाचा उपयोग केला आहे .
अ ==नाही ,श्व ==उद्या ,त्थ =न टिकणारा .जो उद्यापर्यंत टिकत नाही तो अश्वत्थ .ब्रम्ह हे याचे ऊर्ध्व ,माया हे मूळ आहे .माया व ब्रम्हाच्या संबंधातून या वृक्षाची निर्मिती होते .महत तत्व हे याचे कोवळे पान आहे ,त्याला त्रिगुणात्मक अहंकाराचा शेंडा फुटतो ,मन, बुद्धी इ .लहान फांद्या फुटतात ,मग पंचमहाभूते ,पंचज्ञानेंद्रिये हे सूक्ष्म विषय निर्माण होतात .हा वृक्ष प्रतिक्षणी नाश पावतो ,पण हे जगणे व नाश पावणे इतक्या वेगाने होते कि ते सामान्यांना दिसत नाही .महाप्रलयाच्या संहारक वार्यात याची नाळ गळून पडते ,मग पुन्हा कल्पाच्या आरंभी नवनवीन सृष्ट्याचे समूह तयार होतात .कालांतराने या वृक्षातून चौर्यांशी लक्ष योनी मधून जीव जन्माला येतात .या वृक्षाला उन्मळून टाकणारी शक्ती यथार्थ ज्ञान ही आहे .हा वृक्ष खरा आहे असे अज्ञानी मानतात ,पण ज्ञानी याचे क्षणभंगुरत्व जाणतात .
एकी देहाची डिरी तुटे ।तव देहांकुरी बहुनी फुटे ।ऐसेनि भाव्तरू हा वाढे ।अव्यवो जैसा ।
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो न पडतो तोच त्याला अनेक देहरूपी अंकुर फुटतात .म्हणून तो सतत नाश पावत असूनही अविनाशी आहे असे भासते .,जसे पाणी जोरात वाहत जात असते व मागून त्याला तसेच पाणी येऊन मिळत असते तेंव्हा बघनारास तेच पाणी आहे असे वाटते ,किंवा भिंगरी जेंव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेंव्हा बघणाराला ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते ,याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो ,म्हणजेच संसारवृक्ष हा नाशिवंत असूनही मोठ्या वेगाने नाश व निर्माण पावत असल्याने वेडे लोक यास अविनाशी मानतात .,पण ज्ञानी व्यक्तीस हा क्षणभंगुर असून याचे अस्तित्व मिथ्या आहे हे कळते .
सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञानी व्यक्तीला होणारे आकलन हे सामान्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असते ,त्यामुळे तीच गोष्ट पटवण्यासाठी अशा दृष्टांताचा आधार घेणे ही ज्ञानेश्वरांची खास शैली आहे ,त्यामुळे अदृश्य प्रतिमा दृश्य प्रतिमेशी संलग्न होऊन मनात रुजतात ,चटकन समजतात .
अशा या केवळ अज्ञानामुळे बळावलेल्या संसारवृक्षाला आत्मज्ञानरुपी दुधारी तलवारीने नाहीसा कर अशी भगवंत अर्जुनाला आज्ञा करतात व इतर कोणतेही उपाय चालत नाहीत असे सांगतात .
म्हणोनी स्वप्निचीये भय ।ओखद चेवोंची धनंजया ।तेंवी अज्ञानमुला यया ।ज्ञानची खड्ग ।
अर्जुना ,जसे भीतीला जागे होणे हेच औषध ,तसे अज्ञानरूपी मुल असलेल्या संसार वृक्षाचा नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे .
अ ==नाही ,श्व ==उद्या ,त्थ =न टिकणारा .जो उद्यापर्यंत टिकत नाही तो अश्वत्थ .ब्रम्ह हे याचे ऊर्ध्व ,माया हे मूळ आहे .माया व ब्रम्हाच्या संबंधातून या वृक्षाची निर्मिती होते .महत तत्व हे याचे कोवळे पान आहे ,त्याला त्रिगुणात्मक अहंकाराचा शेंडा फुटतो ,मन, बुद्धी इ .लहान फांद्या फुटतात ,मग पंचमहाभूते ,पंचज्ञानेंद्रिये हे सूक्ष्म विषय निर्माण होतात .हा वृक्ष प्रतिक्षणी नाश पावतो ,पण हे जगणे व नाश पावणे इतक्या वेगाने होते कि ते सामान्यांना दिसत नाही .महाप्रलयाच्या संहारक वार्यात याची नाळ गळून पडते ,मग पुन्हा कल्पाच्या आरंभी नवनवीन सृष्ट्याचे समूह तयार होतात .कालांतराने या वृक्षातून चौर्यांशी लक्ष योनी मधून जीव जन्माला येतात .या वृक्षाला उन्मळून टाकणारी शक्ती यथार्थ ज्ञान ही आहे .हा वृक्ष खरा आहे असे अज्ञानी मानतात ,पण ज्ञानी याचे क्षणभंगुरत्व जाणतात .
एकी देहाची डिरी तुटे ।तव देहांकुरी बहुनी फुटे ।ऐसेनि भाव्तरू हा वाढे ।अव्यवो जैसा ।
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो न पडतो तोच त्याला अनेक देहरूपी अंकुर फुटतात .म्हणून तो सतत नाश पावत असूनही अविनाशी आहे असे भासते .,जसे पाणी जोरात वाहत जात असते व मागून त्याला तसेच पाणी येऊन मिळत असते तेंव्हा बघनारास तेच पाणी आहे असे वाटते ,किंवा भिंगरी जेंव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेंव्हा बघणाराला ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते ,याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो ,म्हणजेच संसारवृक्ष हा नाशिवंत असूनही मोठ्या वेगाने नाश व निर्माण पावत असल्याने वेडे लोक यास अविनाशी मानतात .,पण ज्ञानी व्यक्तीस हा क्षणभंगुर असून याचे अस्तित्व मिथ्या आहे हे कळते .
सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञानी व्यक्तीला होणारे आकलन हे सामान्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असते ,त्यामुळे तीच गोष्ट पटवण्यासाठी अशा दृष्टांताचा आधार घेणे ही ज्ञानेश्वरांची खास शैली आहे ,त्यामुळे अदृश्य प्रतिमा दृश्य प्रतिमेशी संलग्न होऊन मनात रुजतात ,चटकन समजतात .
अशा या केवळ अज्ञानामुळे बळावलेल्या संसारवृक्षाला आत्मज्ञानरुपी दुधारी तलवारीने नाहीसा कर अशी भगवंत अर्जुनाला आज्ञा करतात व इतर कोणतेही उपाय चालत नाहीत असे सांगतात .
म्हणोनी स्वप्निचीये भय ।ओखद चेवोंची धनंजया ।तेंवी अज्ञानमुला यया ।ज्ञानची खड्ग ।
अर्जुना ,जसे भीतीला जागे होणे हेच औषध ,तसे अज्ञानरूपी मुल असलेल्या संसार वृक्षाचा नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे .
Monday, September 10, 2012
MANASPUJA
सर्व उपासनेत मानस पूजेला महत्व आहे .मनाने मनापासून सार्या उदात्त कल्पनेने केलेली पूजा ती मानसपूजा ..समर्थ म्हणतात कि काही कारणाने नैमित्तिक पूजा घडली नाही तर मानसपूजा करावी।
मानसपूजेचे ठायी वाणी नाही उपचारा ।तेथे मनच होय माझी मूर्ती ।मनोमय उपचार संपत्ती ।निर्लोभे भजने अर्पिती ।तेथे मी श्रीपती संतुष्ट ।
म्हणजे मानस पूजेत उपचारांना तोटा नाही .मन जेवढे मोठे ,तेवढी मानस पूजाही मोठी करता येते .
जे जे आपणासी ठावे ।ते ते कल्पून वाहिजे ।येणेप्रकारे कीजे ।मानसपूजा ।
श्री गुरूंची मानसपूजा कशी करावी याचा वस्तुपाठ ज्ञानेश्वर १५ व्या अध्यायाच्या १ ते २८ या ओव्यातून घालून देतात .या मानस पुजेची सुरवात ते शुध्द अन्त्करणाच्या चौरंगावर श्रीगुरुंच्या पावलांची स्थापना करून करतात .मग श्रीगुरू व आपण स्वतः यांच्या ऐक्य रुपी ओंजळीत सर्व इंद्रिय रुपी कमळ कळ्या भरून त्याचे अर्घ्य श्रीगुरुच्या चरणी देतात ,त्यानंतर एकनिष्ठा रूप स्वच्छह पाण्याने स्नान घालून श्रीगुरुविषयी असलेल्या वासनेचे गंधाचे बोट लावू ,गुरुविषयीचे प्रेमरूप सोने शुध्द करून त्याचे वाळे गुरूच्या पायी घालू ,अनन्यतेने शुध्द झालेल्या प्रेमाची जोडवी त्यांच्या पायाच्या अंगठ्यात घालू .आनंद रुपी सुवासाने भरलेले अष्टसात्विक भावाचे आठ पाकळयाचे कमळ त्यांच्या पायी वाहू ,अहं वृत्तीचा धूप जाळू ,,मी या देहाधीकातील कोणी नाही हि जी निराभिमान वृत्ती ,त्या तेजाने गुरूस ओवाळू ,माझे शरीर व प्राण या दोन खडावा करून श्रीगुरुंच्या पायात घालू व भोग व मोक्ष हे त्या चरणावरून उतारा म्हणून ओवाळून टाकू .
या पूजेने काय होईल कि आमच्या दैवी चारी पुरुषार्थ साध्य होतील ,ज्ञान उत्कर्ष पावेल ,या दैवाचे योगाने आमचे वक्तृत्व ज्ञानाचा सागर होईल ,या व्याख्यानापुढे नादब्रम्ह ठेंगणे होईल ,जे ज्ञानाला कळत नाही व ध्यानाला सापडत नाही ते ब्रम्ह माझ्या बोलण्यात सापडेल असे भाग्य माझ्या वाचेला गुरुकृपेने लाभेल असे श्री ज्ञानदेव म्हणतात .
मानसपूजेचे ठायी वाणी नाही उपचारा ।तेथे मनच होय माझी मूर्ती ।मनोमय उपचार संपत्ती ।निर्लोभे भजने अर्पिती ।तेथे मी श्रीपती संतुष्ट ।
म्हणजे मानस पूजेत उपचारांना तोटा नाही .मन जेवढे मोठे ,तेवढी मानस पूजाही मोठी करता येते .
जे जे आपणासी ठावे ।ते ते कल्पून वाहिजे ।येणेप्रकारे कीजे ।मानसपूजा ।
श्री गुरूंची मानसपूजा कशी करावी याचा वस्तुपाठ ज्ञानेश्वर १५ व्या अध्यायाच्या १ ते २८ या ओव्यातून घालून देतात .या मानस पुजेची सुरवात ते शुध्द अन्त्करणाच्या चौरंगावर श्रीगुरुंच्या पावलांची स्थापना करून करतात .मग श्रीगुरू व आपण स्वतः यांच्या ऐक्य रुपी ओंजळीत सर्व इंद्रिय रुपी कमळ कळ्या भरून त्याचे अर्घ्य श्रीगुरुच्या चरणी देतात ,त्यानंतर एकनिष्ठा रूप स्वच्छह पाण्याने स्नान घालून श्रीगुरुविषयी असलेल्या वासनेचे गंधाचे बोट लावू ,गुरुविषयीचे प्रेमरूप सोने शुध्द करून त्याचे वाळे गुरूच्या पायी घालू ,अनन्यतेने शुध्द झालेल्या प्रेमाची जोडवी त्यांच्या पायाच्या अंगठ्यात घालू .आनंद रुपी सुवासाने भरलेले अष्टसात्विक भावाचे आठ पाकळयाचे कमळ त्यांच्या पायी वाहू ,अहं वृत्तीचा धूप जाळू ,,मी या देहाधीकातील कोणी नाही हि जी निराभिमान वृत्ती ,त्या तेजाने गुरूस ओवाळू ,माझे शरीर व प्राण या दोन खडावा करून श्रीगुरुंच्या पायात घालू व भोग व मोक्ष हे त्या चरणावरून उतारा म्हणून ओवाळून टाकू .
या पूजेने काय होईल कि आमच्या दैवी चारी पुरुषार्थ साध्य होतील ,ज्ञान उत्कर्ष पावेल ,या दैवाचे योगाने आमचे वक्तृत्व ज्ञानाचा सागर होईल ,या व्याख्यानापुढे नादब्रम्ह ठेंगणे होईल ,जे ज्ञानाला कळत नाही व ध्यानाला सापडत नाही ते ब्रम्ह माझ्या बोलण्यात सापडेल असे भाग्य माझ्या वाचेला गुरुकृपेने लाभेल असे श्री ज्ञानदेव म्हणतात .
Sunday, September 9, 2012
trigun
सत्व ,रज ,तम हे तीन गुण आहेत .प्रकृती यांची जन्म भूमी आहे .हे गुण देहामध्ये अविनाशी जो आत्मा त्याला बंधन करतात .एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी तीन गुणांचे अस्तित्व भासते .
सत्वगुण हा सुखरूपी व ज्ञानरूपी पाशात त्याला अडकवतो ,मग तो अष्ट सात्विक भावांनी गर्वाला चढतो ,विद्येने व मानाने संतुष्ट होतो ,विषय ज्ञानाने आपणास श्रेष्ठ मानतो .
रजोगुण हा अभिलाशारूप असतो .तृष्णा व आसक्ती यापासून निर्माण होतात .तो कर्मपाशाने प्राण्याला बांधतो -तो जीवाला विषयात रंजवतो ,त्याच्या इच्छा अतिशय वाढल्याने दुक्खासकट सर्व गोष्टी त्याला गोडच वाटतात . देहव्यापार करताना तो रात्र अथवा दिवस म्हणत नाही .स्वेच्छेने तो कर्मरूपी अग्नीत स्वतः प्रवेश करतो .
तमोगुण हा अज्ञानातून उत्पन्न होऊन सर्व प्राण्यांना मोह पडतो .प्रमाद ,आळस व निद्रा या पाशांनी तो प्राण्याला बांधतो .अविचार हा तमोगुणाचा महामंत्र आहे .जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते .त्याच्या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जाड्य येते ,मन व इंद्रिये दोन्ही आळस व मूर्खपणाचा आश्रय करतात .अशारितीने सत्वगुण सुखाच्या ठिकाणी ,रजोगुण कर्माच्या ठिकाणी तर तमोगुण प्रमादाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण करतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तुरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत होतो .
गुणातीताचे वर्णन करताना भगवंत म्हणतात
तैसे गुणागुण कार्य हे ।आघवेची आपण आहे ।म्हणोनी एकेका नोहे ।तडातोडी ।
गुण व गुणांचे कार्य हे सारे आपणच आहोत हे जाणूनही त्या गुणांच्या योगे त्याचे चित्त विचलित होत नाही .
साही ऋतू येता आकाशे ।लीम्पिजेची न तैसे ।तेंवी वैषम्य मानसे ।मानिचीना ।
आकाश ज्याप्रमाणे वेगवेगळ्या सहा ऋतुनी लिप्त होत नाही ,त्याप्रमाणे तो मनानेच सर्व भूतामध्ये भेदभाव जाणत नाही .
घरी आलेला पांतस्थ जसा घरासंबंधी उदास असतो ,तसा गुणातीत हा देहाच्या गुणकार्यावर उदास होऊन देहात वस्ती करतो ,गुणांच्या गजबजाटाने तो डोलत नाही ,अशा अभेद भक्तिभावाने जो गुणांच्या पलीकडे जाऊन माझी भक्ती करतो ,तो ब्रह्मत्व प्राप्त होण्याच्या योग्यतेचा होतो .
सत्वगुण हा सुखरूपी व ज्ञानरूपी पाशात त्याला अडकवतो ,मग तो अष्ट सात्विक भावांनी गर्वाला चढतो ,विद्येने व मानाने संतुष्ट होतो ,विषय ज्ञानाने आपणास श्रेष्ठ मानतो .
रजोगुण हा अभिलाशारूप असतो .तृष्णा व आसक्ती यापासून निर्माण होतात .तो कर्मपाशाने प्राण्याला बांधतो -तो जीवाला विषयात रंजवतो ,त्याच्या इच्छा अतिशय वाढल्याने दुक्खासकट सर्व गोष्टी त्याला गोडच वाटतात . देहव्यापार करताना तो रात्र अथवा दिवस म्हणत नाही .स्वेच्छेने तो कर्मरूपी अग्नीत स्वतः प्रवेश करतो .
तमोगुण हा अज्ञानातून उत्पन्न होऊन सर्व प्राण्यांना मोह पडतो .प्रमाद ,आळस व निद्रा या पाशांनी तो प्राण्याला बांधतो .अविचार हा तमोगुणाचा महामंत्र आहे .जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते .त्याच्या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जाड्य येते ,मन व इंद्रिये दोन्ही आळस व मूर्खपणाचा आश्रय करतात .अशारितीने सत्वगुण सुखाच्या ठिकाणी ,रजोगुण कर्माच्या ठिकाणी तर तमोगुण प्रमादाच्या ठिकाणी आसक्ती निर्माण करतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तुरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत होतो .
गुणातीताचे वर्णन करताना भगवंत म्हणतात
तैसे गुणागुण कार्य हे ।आघवेची आपण आहे ।म्हणोनी एकेका नोहे ।तडातोडी ।
गुण व गुणांचे कार्य हे सारे आपणच आहोत हे जाणूनही त्या गुणांच्या योगे त्याचे चित्त विचलित होत नाही .
साही ऋतू येता आकाशे ।लीम्पिजेची न तैसे ।तेंवी वैषम्य मानसे ।मानिचीना ।
आकाश ज्याप्रमाणे वेगवेगळ्या सहा ऋतुनी लिप्त होत नाही ,त्याप्रमाणे तो मनानेच सर्व भूतामध्ये भेदभाव जाणत नाही .
घरी आलेला पांतस्थ जसा घरासंबंधी उदास असतो ,तसा गुणातीत हा देहाच्या गुणकार्यावर उदास होऊन देहात वस्ती करतो ,गुणांच्या गजबजाटाने तो डोलत नाही ,अशा अभेद भक्तिभावाने जो गुणांच्या पलीकडे जाऊन माझी भक्ती करतो ,तो ब्रह्मत्व प्राप्त होण्याच्या योग्यतेचा होतो .
Saturday, September 8, 2012
gunatit
चौदाव्या अध्यायाच्या प्रारंभीच श्रीज्ञानेश्वर म्हणतात कि सर्व ज्ञानाहून श्रेष्ठ आत्मज्ञान ,त्याची प्राप्ती झाली कि परमेश्वराचे दर्शन घडते ..हे आत्मज्ञान काय सांगते ?तर नाशवंत मानवी शरीर म्हणजे मी नाही ,तर शरीर हे केवळ साधन आहे ,आपण आहोत आत्मतत्व -परमात्म्याचा एक अंश .या विश्वातील नाना पदार्थामध्ये एकच ईश्वरी तत्व आहे -हे सारे पदार्थ एकाच चिदवस्तूतून जन्म घेतात व तेथेच पुन्हा क्षय पावतात .ज्या साधकांना या ब्रम्ह ज्ञानाचा साक्षात्कार होतो ते भगवंतासारखेच आनंदमय व सत्यरूप होतात .
मी जैसा अनन्तानंदू ।जैसाची सत्यसिंधु ।तैसेची ते भेदु ।उरेचिना ।
हे जग पंचमहाभूतात्मक शरीर व आत्मतत्व यांच्या संबंधाने उत्पन्न होते .आत्मा हा खरा गुणातीत आहे ,पण प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याने तो सत्व ,रज ,तम या गुणांच्या स्वाधीन झाला आहे।यामुळे संसारी झाल्याने त्यास सुख दुखाचा भोग मिळतो .मूळ आत्मा ज्ञानरूपच आहे ,पण त्याने संसार आवडून घेतल्याने त्याला आपलेच हे मुळरूप परके झाले आहे .
एरव्ही ज्ञान हे आपुले ।परि पर ऐसेची झाले ।जे आवडोनि घेतले ।भव स्वर्गादिक ।
माया हे ब्रम्हाचे सृष्टीचे बीज ठेवण्याचे ठिकाण आहे ,त्या बीजापासून ब्रम्हाच्या केवळ आधारे सर्व भूतांची उत्पत्ती होते .माया किंवा प्रकृती किंवा अव्यक्त हिचा पसारा हे केवळ अज्ञान आहे कारण ते विनाशी आहे .
आपला आपणपेया ।विसरू जो धनंजया ।तेंची रूप यया ।अज्ञानासी ।
आपल्या आत्मतत्त्वाचा आपल्यास जो विसर पडतो ते या अज्ञानाचे रूप आहे .नाशिवंत शरीरास क्षेत्र व अज्ञानाने गुंडाळलेल्या मूळ चितप्रकाशास क्षेत्रज्ञ असे नाव आहे .आत्मतत्वावरून दृष्टी घसरल्यावर जे जे दृश्य समोर येते त्याचे नाव सृष्टी आहे .
ब्रम्हाच्या व मायेच्या संगात प्रथम बुद्धी तत्व जन्माला आले .नंतर मन जन्मले .मनाने अहंकार तत्व तयार केले .त्याने पंचमहाभूताना आकारास आणले .अशा ८ विकारांनी जगतरुपी गर्भाची वाढ होते। असा हा गर्भ पिंड व्यक्त होतो तेंव्हा वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला गर्भ त्यात प्रवेश करतो .हा पिंड सत्व ,रज ,तम या त्रिगुणांचा बनलेला असतो .हे गुण देहात वास करणाऱ्या अविनाशी आत्म्यास बंधन करतात .आत्मा जीव दशेत थोडासा प्रवेश करतो तोच त्रिगुणामुळे हा देह म्हणजे मी असे म्हणू लागतो .जन्म ते मरण देहाचे सारे धर्म ते माझे असा अभिमान घेतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तूरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत माझ्यापर्यंत पोहोचतो .
मी जैसा अनन्तानंदू ।जैसाची सत्यसिंधु ।तैसेची ते भेदु ।उरेचिना ।
हे जग पंचमहाभूतात्मक शरीर व आत्मतत्व यांच्या संबंधाने उत्पन्न होते .आत्मा हा खरा गुणातीत आहे ,पण प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याने तो सत्व ,रज ,तम या गुणांच्या स्वाधीन झाला आहे।यामुळे संसारी झाल्याने त्यास सुख दुखाचा भोग मिळतो .मूळ आत्मा ज्ञानरूपच आहे ,पण त्याने संसार आवडून घेतल्याने त्याला आपलेच हे मुळरूप परके झाले आहे .
एरव्ही ज्ञान हे आपुले ।परि पर ऐसेची झाले ।जे आवडोनि घेतले ।भव स्वर्गादिक ।
माया हे ब्रम्हाचे सृष्टीचे बीज ठेवण्याचे ठिकाण आहे ,त्या बीजापासून ब्रम्हाच्या केवळ आधारे सर्व भूतांची उत्पत्ती होते .माया किंवा प्रकृती किंवा अव्यक्त हिचा पसारा हे केवळ अज्ञान आहे कारण ते विनाशी आहे .
आपला आपणपेया ।विसरू जो धनंजया ।तेंची रूप यया ।अज्ञानासी ।
आपल्या आत्मतत्त्वाचा आपल्यास जो विसर पडतो ते या अज्ञानाचे रूप आहे .नाशिवंत शरीरास क्षेत्र व अज्ञानाने गुंडाळलेल्या मूळ चितप्रकाशास क्षेत्रज्ञ असे नाव आहे .आत्मतत्वावरून दृष्टी घसरल्यावर जे जे दृश्य समोर येते त्याचे नाव सृष्टी आहे .
ब्रम्हाच्या व मायेच्या संगात प्रथम बुद्धी तत्व जन्माला आले .नंतर मन जन्मले .मनाने अहंकार तत्व तयार केले .त्याने पंचमहाभूताना आकारास आणले .अशा ८ विकारांनी जगतरुपी गर्भाची वाढ होते। असा हा गर्भ पिंड व्यक्त होतो तेंव्हा वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला गर्भ त्यात प्रवेश करतो .हा पिंड सत्व ,रज ,तम या त्रिगुणांचा बनलेला असतो .हे गुण देहात वास करणाऱ्या अविनाशी आत्म्यास बंधन करतात .आत्मा जीव दशेत थोडासा प्रवेश करतो तोच त्रिगुणामुळे हा देह म्हणजे मी असे म्हणू लागतो .जन्म ते मरण देहाचे सारे धर्म ते माझे असा अभिमान घेतो .
ज्यावेळी पुरुष गुणांना जाणून घेऊन हे गुणच सार्या कर्माचा कर्ता आहेत व गुणाहून वेगळा चिदवस्तूरूप आत्मा म्हणजे मी आहे हे जाणतो तेंव्हा तो गुणातीत माझ्यापर्यंत पोहोचतो .
Thursday, September 6, 2012
sangit
लेखक -श्री .पु .ल .देशपांडे -संदर्भ -गाठोडे -परचुरे प्रकाशन -मलपृष्ठ
हिंदू धर्मातल्या संगीताच्या स्थानाबद्दल काही बोलायला नको .साक्षात भगवंताच्या मुखातून महाकवी वदले आहेत नाहं वसामि वैकुंठे ।योगिना हृदये तथा ।मद भक्ता यत्र गायन्ति ।तत्र तिष्ठामि नारद ।
मी वैकुंठात राहत नाही ,तर योग्यांच्या हृदयात राहतो .माझे भक्त जिथे गात असतात नारदा ,तिथे मी उभा असतो .बसलेला असतो असे म्हटलेले नाही ,कारण गाणार्यापुढे साक्षात भगवंताला सुध्दा बसावेसे वाटत नाही ,उभे रहावेसे वाटते ,हा तिथे आदराने उभा असतो कारण स्वतःचा अहंकार विसरून गाणार्या भक्ताचे दर्शन हे खुद्द भगवंतालाही अत्यंत लोभसवाणे वाटत असणारच .संगीताची सोबत घेतल्याशिवाय ईश्वराशी संवाद साधताच येत नाही,अशी धारणा आमच्या देशात होती .मीरा काय ,कबीर काय ,सूरदास काय , पुरंदरदास काय ,त्यागराज काय ,किंवा ज्ञानेश्वर ,तुकाराम ,नामदेव ,एकनाथ ,चोखामेळा ,कान्होपात्रा काय ;सगळे जण आपल्या गाण्यातून देवाशी आणि देवत्व जपणाऱ्या लोकांशी संवाद साधून गेले आहेत .तुकोबा तर "वेडे वाकुडे गाईन ।परि तुझा म्हणवीन ।"असे म्हणतात ,"मी गातो नाचतो आनंदे "म्हणतात .समर्थ सुध्दा "धन्य ते गायनी कळा।"असे म्हणून गेले आहेत .संगीत हा भारतीयांचाच नव्हे ,तर मानवी संस्कृतीचाच प्राण आहे .हिंदू धर्मात तर आपले जेष्ठ तत्वज्ञानसुध्दा गायले आहे .आपल्या तत्व ज्ञानावर ग्रंथ गीता आहे ,जे गायले गेलेले गीत आहे .मनुष्यांना एकत्र आणण्याचे फार मोठे सामर्थ्य सुरांमध्ये असते .
हिंदू धर्मातल्या संगीताच्या स्थानाबद्दल काही बोलायला नको .साक्षात भगवंताच्या मुखातून महाकवी वदले आहेत नाहं वसामि वैकुंठे ।योगिना हृदये तथा ।मद भक्ता यत्र गायन्ति ।तत्र तिष्ठामि नारद ।
मी वैकुंठात राहत नाही ,तर योग्यांच्या हृदयात राहतो .माझे भक्त जिथे गात असतात नारदा ,तिथे मी उभा असतो .बसलेला असतो असे म्हटलेले नाही ,कारण गाणार्यापुढे साक्षात भगवंताला सुध्दा बसावेसे वाटत नाही ,उभे रहावेसे वाटते ,हा तिथे आदराने उभा असतो कारण स्वतःचा अहंकार विसरून गाणार्या भक्ताचे दर्शन हे खुद्द भगवंतालाही अत्यंत लोभसवाणे वाटत असणारच .संगीताची सोबत घेतल्याशिवाय ईश्वराशी संवाद साधताच येत नाही,अशी धारणा आमच्या देशात होती .मीरा काय ,कबीर काय ,सूरदास काय , पुरंदरदास काय ,त्यागराज काय ,किंवा ज्ञानेश्वर ,तुकाराम ,नामदेव ,एकनाथ ,चोखामेळा ,कान्होपात्रा काय ;सगळे जण आपल्या गाण्यातून देवाशी आणि देवत्व जपणाऱ्या लोकांशी संवाद साधून गेले आहेत .तुकोबा तर "वेडे वाकुडे गाईन ।परि तुझा म्हणवीन ।"असे म्हणतात ,"मी गातो नाचतो आनंदे "म्हणतात .समर्थ सुध्दा "धन्य ते गायनी कळा।"असे म्हणून गेले आहेत .संगीत हा भारतीयांचाच नव्हे ,तर मानवी संस्कृतीचाच प्राण आहे .हिंदू धर्मात तर आपले जेष्ठ तत्वज्ञानसुध्दा गायले आहे .आपल्या तत्व ज्ञानावर ग्रंथ गीता आहे ,जे गायले गेलेले गीत आहे .मनुष्यांना एकत्र आणण्याचे फार मोठे सामर्थ्य सुरांमध्ये असते .
Tuesday, September 4, 2012
dnyaneshwari lekhanhetu
गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञान प्रधान शास्त्र आहे ,पण सर्व जीव तर अज्ञानाने बांधलेले आहेत .तेंव्हा अशा अज्ञानी जीवाना मोक्ष पद मिळण्याची योग्यता मिळवण्यासाठी गीतेने कर्म उपासनेचा मार्ग सांगितला आहे .जो खरा ज्ञानी पुरुष आहे तो निष्काम कर्मयोगीच असतो ,कारण शरीर धारण करीत आहोत तो पर्यंत कर्मत्याग शक्य नाही .जेंव्हा निष्काम कर्मयोगी अंतकरण स्थिर करून इंद्रियांचे व्यापार सुरु ठेवतो तेंव्हा त्याचे कर्म हे संकल्प विरहीत व फलाशा त्यागून केलेले असते ,म्हणून तो खरा कर्मापासून मुक्तच असतो ,त्याला कर्मबंध न लागता मोक्षापर्यंत जाता येते .हा जीवनक्रमच एक नित्य यज्ञ आहे .अज्ञानी पुरुषांना कर्म कसे करावे याचा आदर्श या कर्मयोग्यांच्या जीवनाकडे बघून मिळतो ,म्हणून ज्ञानी पुरुषाने कर्म अवश्य करावीत .
मार्गाधारे वर्तावे ।विश्व हे मोहारे लावावे ।अलौकिक नोहावे ।लोकप्रति ।अ ३ -१८१
भगवंत म्हणतात कि मी स्वतः पूर्णकाम असूनही प्राणीमात्र माझ्याकडे बघून चालतात म्हणून मी सकाम पुरुषाप्रमाणे कर्माचरण करतो . ते अर्जुनास उपदेश करतात कि लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे ,शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे ,लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये .
श्री ज्ञानेश्वर हे स्वतः जीवन्मुक्त ज्ञानी पुरुष असूनही त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा प्रपंच का मांडला याचे उत्तर त्यांच्या या उपदेशात दिसते .वैदिक धर्माने ब्रम्हज्ञान हे संस्कृत भाषेत व अधिकाराच्या कक्षेत बांधून ठेवले .त्यामुळे समाजातील मोठा वर्ग हा ज्ञानापासून व मुक्तीच्या मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन मिळण्यापासून वंचित राहिला .ह्या वंचित समाजाला ज्ञानाच्या ,भक्तीच्या कक्षेतआणणे हा ज्ञानेश्वरांनी आपला जीवनधर्म मानला आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्राकृत भाषेतील ग्रंथ रचना करण्याचा संकल्प केला .
तैसा मनाचा मारू न करता ।आणि इंद्रिया दुखः न देता ।एथ मोक्षु असे आयता ।श्रवणाची माजी ।अ ४ -२२३
आपल्या कथेबद्दल ते म्हणतात कि येथे मनाला न मारता ,इंद्रियांना दुखः न देता आयते फक्त श्रवणाने मोक्ष मिळणार आहे .आपल्या ग्रंथ लेखनाचा हेतू सांगताना ते म्हणतात कि माझी शब्दरूपी ताटे ,त्यात मोक्ष रुपी पक्वान्ने ,ही मेजवानी मी निष्काम पुरुषास केली आहे .आपले बोल हे केवळ शब्द नसून संसार जिंकणारे शास्त्र आहेत ,ही आत्म्या पर्यंत पोहोचवणारी मंत्राक्षरे आहेत असे ते सांगतात म्हणजे मोक्ष मार्गावर सर्वाना बरोबर घेऊन चालणे हे त्यांचे उद्दिष्ट होते .
श्रीगुरुना ज्ञानेश्वर विनंती करतात कि या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रम्ह सुखाचेच देणेघेणे होऊ दे आपली प्रतिज्ञा सांगताना ते म्हणतात कि वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू ,सार्या जगाला आनंदाचा कोट करू .हे गुरु ,परब्रम्ह सर्वांच्या डोळ्यास दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो .सर्व जगाला ब्राम्ह्ज्ञानाचे मार्गावर नेणे ,सर्व जग आनंदानं भरून टाकण्याची इच्छा करणे यात श्रीज्ञानेश्वरांचे वेगळेपण आहे आजवर वैयक्तिक मार्गदर्शन केले गेले होते ,पण समाजाने एकसंधपणे धर्माचरण कसे करावे ,या मोक्ष मार्गावर भक्तीचा सोपा घाट कसा बांधावा ,संसारात राहूनही स्वताबरोबर जगाचा उध्दार कसा करावा हे सांगणारी भागवत धर्माची गुढी उभी केली श्री ज्ञानेश्वरांनी ,त्यांना शतशत प्रणाम
मार्गाधारे वर्तावे ।विश्व हे मोहारे लावावे ।अलौकिक नोहावे ।लोकप्रति ।अ ३ -१८१
भगवंत म्हणतात कि मी स्वतः पूर्णकाम असूनही प्राणीमात्र माझ्याकडे बघून चालतात म्हणून मी सकाम पुरुषाप्रमाणे कर्माचरण करतो . ते अर्जुनास उपदेश करतात कि लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे ,शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे ,लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये .
श्री ज्ञानेश्वर हे स्वतः जीवन्मुक्त ज्ञानी पुरुष असूनही त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा प्रपंच का मांडला याचे उत्तर त्यांच्या या उपदेशात दिसते .वैदिक धर्माने ब्रम्हज्ञान हे संस्कृत भाषेत व अधिकाराच्या कक्षेत बांधून ठेवले .त्यामुळे समाजातील मोठा वर्ग हा ज्ञानापासून व मुक्तीच्या मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन मिळण्यापासून वंचित राहिला .ह्या वंचित समाजाला ज्ञानाच्या ,भक्तीच्या कक्षेतआणणे हा ज्ञानेश्वरांनी आपला जीवनधर्म मानला आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्राकृत भाषेतील ग्रंथ रचना करण्याचा संकल्प केला .
तैसा मनाचा मारू न करता ।आणि इंद्रिया दुखः न देता ।एथ मोक्षु असे आयता ।श्रवणाची माजी ।अ ४ -२२३
आपल्या कथेबद्दल ते म्हणतात कि येथे मनाला न मारता ,इंद्रियांना दुखः न देता आयते फक्त श्रवणाने मोक्ष मिळणार आहे .आपल्या ग्रंथ लेखनाचा हेतू सांगताना ते म्हणतात कि माझी शब्दरूपी ताटे ,त्यात मोक्ष रुपी पक्वान्ने ,ही मेजवानी मी निष्काम पुरुषास केली आहे .आपले बोल हे केवळ शब्द नसून संसार जिंकणारे शास्त्र आहेत ,ही आत्म्या पर्यंत पोहोचवणारी मंत्राक्षरे आहेत असे ते सांगतात म्हणजे मोक्ष मार्गावर सर्वाना बरोबर घेऊन चालणे हे त्यांचे उद्दिष्ट होते .
श्रीगुरुना ज्ञानेश्वर विनंती करतात कि या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रम्ह सुखाचेच देणेघेणे होऊ दे आपली प्रतिज्ञा सांगताना ते म्हणतात कि वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू ,सार्या जगाला आनंदाचा कोट करू .हे गुरु ,परब्रम्ह सर्वांच्या डोळ्यास दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो .सर्व जगाला ब्राम्ह्ज्ञानाचे मार्गावर नेणे ,सर्व जग आनंदानं भरून टाकण्याची इच्छा करणे यात श्रीज्ञानेश्वरांचे वेगळेपण आहे आजवर वैयक्तिक मार्गदर्शन केले गेले होते ,पण समाजाने एकसंधपणे धर्माचरण कसे करावे ,या मोक्ष मार्गावर भक्तीचा सोपा घाट कसा बांधावा ,संसारात राहूनही स्वताबरोबर जगाचा उध्दार कसा करावा हे सांगणारी भागवत धर्माची गुढी उभी केली श्री ज्ञानेश्वरांनी ,त्यांना शतशत प्रणाम
dnyaneshwarpranit yadny
वैदिक परंपरेतून यज्ञाला मिळालेले हे अधिष्ठान श्रीकृष्ण काळातही समाजमान्य होते ,म्हणून गीतेने यज्ञ चर्चा तर केली ,पण तिला निसर्ग चक्रानुसार कर्माशी बांधून व त्यातील कर्तृत्व मद आणि आसक्ती यांचा त्याग करण्यास सांगून निष्काम कर्मयोगाची कल्पना प्रथम मांडली .
म्हणोनी फळी लागू ।सांडोनी देह्संगू ।कर्मे करावी हा चांगु ।निरोप माझा ।अ १८ -१७६
याचा अर्थ यज्ञ ,दान ,तप हि कर्मे फळाची इच्छा त्यागून केली तर त्याने चित्त शुध्द होते असा भगवंताचा निरोप आहे
ज्ञानेश्वर काळात यज्ञ संस्थेचा जोर ओसरला होता .आदि शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले ,पण यज्ञसंस्था व कर्मकांड यांचे महत्व कमी झाले होते .श्रीज्ञानेश्वरांनी कर्म या वैदिक संकल्पनेला स्थलकालानुरूप उचित अथवा विहित कर्म हि कल्पना जोडली व धर्माचे एक नवेच परिमाण प्राप्त करून दिले .
नियत कर्मे केलीच पाहिजेत हे सांगताना प्राप्त परिस्थितीत योग्य ,हेतुरहित ,चातुर्वर्ण्यानुसार कर्तव्य ठरणारे कर्म निष्काम होऊन करणे ,कर्मफलाचा त्याग करून करणे हा स्वधर्म व हाच कर्म यज्ञ होय .अशा स्वधर्माचरणाने मोक्ष प्राप्ती होते असा विचार ते मांडतात .यामुळे कर्म आणि यज्ञ यांचा काळानुसार विस्तार होऊन ते कृतीत आणण्यास सुलभ होतात स्वधर्म हाच यज्ञ म्हणून स्वीकारण्याने यज्ञातील फलेच्छा जाऊन तो अखंड चालणारा नित्य यज्ञ होतो .
स्वधर्मु जो बापा ।तोची नित्य यज्ञु जाण पां ।
म्हणोनी स्वधर्माधीष्ठान ।ते अखंड यज्ञ याजन ।जो करी तया बंधन ।काहीच नाही ।
सकाम कर्म व कर्मकांड यांना येथे स्थान नाही .निष्काम कर्मयोगाची पायरी गाठण्यासाठी संताना शरण जावे असे ज्ञानेश्वर सांगतात हा निष्काम कर्मयोगी ज्या सहजावस्थेत जगतो तीच भक्ती होय
पुढे यज्ञ या संकल्पनेचा अजून विस्तार करताना ज्ञानेश्वर मोठेच अंतर पार करतात .त्यांचा प्रजापती वर्ण विशेषांप्रमाणे स्वधर्माचरण करून उध्दार करून घेणे जीवांच्याच हाती सोपवतो व काय करू नये हे सांगताना व्रते ,नियम ,आत्मदंड ,तीर्थयात्रा ,योग ,अनुष्ठान या गोष्टी टाळण्यास सांगतो .
श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि यज्ञ म्हणजे होमहवन वगैरे काही नाही ,तर जीवन हाच एक यज्ञ आहे ,आपले जगणे ,आपली कर्मे हि हविर्द्रव्ये आहेत -ती या जीवन यज्ञात अर्पण करायची आहेत .
सृष्टीची भगवंताने केलेली उत्पत्ती हा पहिला महायज्ञ ,तेथून ते तुझ्या जगण्या पर्यंत हे यज्ञ चक्र अविरत फिरत आहे .
म्हणोनी फळी लागू ।सांडोनी देह्संगू ।कर्मे करावी हा चांगु ।निरोप माझा ।अ १८ -१७६
याचा अर्थ यज्ञ ,दान ,तप हि कर्मे फळाची इच्छा त्यागून केली तर त्याने चित्त शुध्द होते असा भगवंताचा निरोप आहे
ज्ञानेश्वर काळात यज्ञ संस्थेचा जोर ओसरला होता .आदि शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले ,पण यज्ञसंस्था व कर्मकांड यांचे महत्व कमी झाले होते .श्रीज्ञानेश्वरांनी कर्म या वैदिक संकल्पनेला स्थलकालानुरूप उचित अथवा विहित कर्म हि कल्पना जोडली व धर्माचे एक नवेच परिमाण प्राप्त करून दिले .
नियत कर्मे केलीच पाहिजेत हे सांगताना प्राप्त परिस्थितीत योग्य ,हेतुरहित ,चातुर्वर्ण्यानुसार कर्तव्य ठरणारे कर्म निष्काम होऊन करणे ,कर्मफलाचा त्याग करून करणे हा स्वधर्म व हाच कर्म यज्ञ होय .अशा स्वधर्माचरणाने मोक्ष प्राप्ती होते असा विचार ते मांडतात .यामुळे कर्म आणि यज्ञ यांचा काळानुसार विस्तार होऊन ते कृतीत आणण्यास सुलभ होतात स्वधर्म हाच यज्ञ म्हणून स्वीकारण्याने यज्ञातील फलेच्छा जाऊन तो अखंड चालणारा नित्य यज्ञ होतो .
स्वधर्मु जो बापा ।तोची नित्य यज्ञु जाण पां ।
म्हणोनी स्वधर्माधीष्ठान ।ते अखंड यज्ञ याजन ।जो करी तया बंधन ।काहीच नाही ।
सकाम कर्म व कर्मकांड यांना येथे स्थान नाही .निष्काम कर्मयोगाची पायरी गाठण्यासाठी संताना शरण जावे असे ज्ञानेश्वर सांगतात हा निष्काम कर्मयोगी ज्या सहजावस्थेत जगतो तीच भक्ती होय
पुढे यज्ञ या संकल्पनेचा अजून विस्तार करताना ज्ञानेश्वर मोठेच अंतर पार करतात .त्यांचा प्रजापती वर्ण विशेषांप्रमाणे स्वधर्माचरण करून उध्दार करून घेणे जीवांच्याच हाती सोपवतो व काय करू नये हे सांगताना व्रते ,नियम ,आत्मदंड ,तीर्थयात्रा ,योग ,अनुष्ठान या गोष्टी टाळण्यास सांगतो .
श्री ज्ञानेश्वर म्हणतात कि यज्ञ म्हणजे होमहवन वगैरे काही नाही ,तर जीवन हाच एक यज्ञ आहे ,आपले जगणे ,आपली कर्मे हि हविर्द्रव्ये आहेत -ती या जीवन यज्ञात अर्पण करायची आहेत .
सृष्टीची भगवंताने केलेली उत्पत्ती हा पहिला महायज्ञ ,तेथून ते तुझ्या जगण्या पर्यंत हे यज्ञ चक्र अविरत फिरत आहे .
Monday, September 3, 2012
vedkalin yadnya
ब्रम्हदेवाने सृष्टीची रचना करताना यज्ञासहवर्तमान प्रजा उत्पन्न केली .पुढे ते म्हणाले कि या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या ,हा तुमच्या इष्ट कामना पूर्ण करील .;अ ३-ओवी १०
ओम यद्नेन यद्न मजयंत देवाः ।तानि धर्माणी प्रथामान्यास
सर्वात पहिला धर्म म्हणजे यज्ञ .यज्ञात आहुतीला महत्व .हवन म्हणजे ईश्वराप्रित्यार्थ समर्पण=यज्ञ
यज्ञात भवती पर्जन्यः -यज्ञ -पर्जन्य -अन्न पाणी -भूतसृष्टी -कर्म अशी शृंखला आहे .जीवसृष्टीची मुलभूत प्रेरणा म्हणजे यज्ञ जीवनधारणा =यज्ञ
यज्ञ ही एक क्रिया आहे .अग्नी हे परमेश्वराचे मुख आहे .आपण अग्नीला हवी देतो ,तो आपल्याला तेज देतो ,असे हे चक्र आहे .तुमच्यातील उर्जा व मूळ आदिउर्जा यांचे हे चक्र आहे
चवथ्या अध्यायात द्रव्य यज्ञ ,तपो यज्ञ ,स्वाध्याय यज्ञ ,जप यज्ञ ,वाग यज्ञ ,यांचे उल्लेख येतात ,पण ज्ञान यज्ञ हा सर्व श्रेष्ठ मानला आहे .
वेद सांगतात कि प्रत्येकाने नित्य पंच महा यज्ञ करावे .ते आहेत भूत यज्ञ ,पितृयज्ञ ,देव यज्ञ ,वैश्व देव ,काकबळी इत्यादी .
आध्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले ,पण यज्ञ संस्था व कर्मकांडे यांचा जोर कमीच झाला होता .
ओम यद्नेन यद्न मजयंत देवाः ।तानि धर्माणी प्रथामान्यास
सर्वात पहिला धर्म म्हणजे यज्ञ .यज्ञात आहुतीला महत्व .हवन म्हणजे ईश्वराप्रित्यार्थ समर्पण=यज्ञ
यज्ञात भवती पर्जन्यः -यज्ञ -पर्जन्य -अन्न पाणी -भूतसृष्टी -कर्म अशी शृंखला आहे .जीवसृष्टीची मुलभूत प्रेरणा म्हणजे यज्ञ जीवनधारणा =यज्ञ
यज्ञ ही एक क्रिया आहे .अग्नी हे परमेश्वराचे मुख आहे .आपण अग्नीला हवी देतो ,तो आपल्याला तेज देतो ,असे हे चक्र आहे .तुमच्यातील उर्जा व मूळ आदिउर्जा यांचे हे चक्र आहे
चवथ्या अध्यायात द्रव्य यज्ञ ,तपो यज्ञ ,स्वाध्याय यज्ञ ,जप यज्ञ ,वाग यज्ञ ,यांचे उल्लेख येतात ,पण ज्ञान यज्ञ हा सर्व श्रेष्ठ मानला आहे .
वेद सांगतात कि प्रत्येकाने नित्य पंच महा यज्ञ करावे .ते आहेत भूत यज्ञ ,पितृयज्ञ ,देव यज्ञ ,वैश्व देव ,काकबळी इत्यादी .
आध्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले ,पण यज्ञ संस्था व कर्मकांडे यांचा जोर कमीच झाला होता .
aishwaryyog
ईश्वर या शब्दाचे भाव वाचक नाम म्हणून ऐश्वर्य हा शब्द तयार झाला .भाववाचक नाम हे मूळ नामाचे स्वरूप ओळखणारी लक्षणे दाखवते .ही लक्षणे दोन प्रकारची असतात .जे बदलू शकते ,परिवर्तनीय आहे ते तटस्थ लक्षण ,जे ईश्वराचे सगुणत्व आहे .जे कायम आहे ,अपरिवर्तनीय आहे ते स्वरूप लक्षण ,ते ईश्वराचे निर्गुणत्व आहे ,म्हणून तेच खरे आहे व हा खरा ऐश्वर्ययोग .
आईका यश ,श्री ,औदार्य ,।ज्ञान ,वैराग्य ,ऐश्वर्य ।हे साही गुणवर्य ।वसती जेथ ।
यश ,श्री ,औदार्य ,ज्ञान ,वैराग्य ,ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात त्याला भगवंत असे म्हणतात .
हा आमुचा ऐश्वर्ययोगु ।तुवा देखिला कि चांगु ।आता सांगे काही येथ लागू ।भूतभेदाचा असे ।अ ९ -८७
ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्यप्रकाश एकच आहे ,त्याप्रमाणे मी जग या कल्पनेला आश्रय आहे ,मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे ,तर मग येथे मी व भूतमात्र यात भेदभाव करण्याचे काही कारण आहे का ?हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला का ?
नवव्या अध्यायात ज्ञान -विज्ञानाचा विषय समजावून सांगताना भगवंत म्हणतात कि अखंड ,निराकार अशा मला मायेच्या कर्तृत्वाने विश्वरूप प्राप्त होते .मी सर्वत्र व्याप्त आहे, मी काही करत नाही अथवा करवत नाही ,केवळ निमित्त मात्र आहे ,माझ्या आधाराने माया हे विश्व निर्माण करते .जसे सागरावर वायूच्या योगाने लाटा उत्पन्न होतात ,त्या लाटात सागर असतोच ,पण लाटा विरून गेल्या तरी सागराचे अस्तित्व कायम असते .म्हणून खरे भक्त हे सर्व सृष्टी हे माझे रूप समजून सर्वत्र नमस्कार करीत राहतात व मद्रूप होतात हा माझा ऐश्वर्ययोग आहे .
आपल्या मूळ स्वरूपाविषयी भगवंत म्हणतात , माझे स्वरूप निर्मल ,शुध्द ,अखंड आहे .प्रकृतीने निर्माण केलेली भूतसृष्टी कल्पांती प्रकृतीतच विलीन होते .नवीन कल्पाच्या आरंभी प्रकृती पुन्हा कार्यरत होते .मी अध्यक्ष असून प्रकृती हे चराचर निर्माण करते .मला विनाशी अशा मनुष्य रुपात लोक पाहतात ,हे अज्ञान आहे ,तर विश्वा पलीकडचे माझे मूळ अव्यक्त असे रूप जाणून घेणे हा माझा ऐश्वर्य योग आहे .
ऐश्वर्य योग म्हणजे अद्वैत परमात्म तत्वाचे यथार्थ रूप विशद करणे -यात आत्मतत्व आणि सृष्टी यांचा संबंध उलगडून दाखवला आहे .हे अवाच्य असे ज्ञान भगवंतानी नवव्या अध्यायात वाच्य केले आहे
आईका यश ,श्री ,औदार्य ,।ज्ञान ,वैराग्य ,ऐश्वर्य ।हे साही गुणवर्य ।वसती जेथ ।
यश ,श्री ,औदार्य ,ज्ञान ,वैराग्य ,ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात त्याला भगवंत असे म्हणतात .
हा आमुचा ऐश्वर्ययोगु ।तुवा देखिला कि चांगु ।आता सांगे काही येथ लागू ।भूतभेदाचा असे ।अ ९ -८७
ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्यप्रकाश एकच आहे ,त्याप्रमाणे मी जग या कल्पनेला आश्रय आहे ,मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे ,तर मग येथे मी व भूतमात्र यात भेदभाव करण्याचे काही कारण आहे का ?हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला का ?
नवव्या अध्यायात ज्ञान -विज्ञानाचा विषय समजावून सांगताना भगवंत म्हणतात कि अखंड ,निराकार अशा मला मायेच्या कर्तृत्वाने विश्वरूप प्राप्त होते .मी सर्वत्र व्याप्त आहे, मी काही करत नाही अथवा करवत नाही ,केवळ निमित्त मात्र आहे ,माझ्या आधाराने माया हे विश्व निर्माण करते .जसे सागरावर वायूच्या योगाने लाटा उत्पन्न होतात ,त्या लाटात सागर असतोच ,पण लाटा विरून गेल्या तरी सागराचे अस्तित्व कायम असते .म्हणून खरे भक्त हे सर्व सृष्टी हे माझे रूप समजून सर्वत्र नमस्कार करीत राहतात व मद्रूप होतात हा माझा ऐश्वर्ययोग आहे .
आपल्या मूळ स्वरूपाविषयी भगवंत म्हणतात , माझे स्वरूप निर्मल ,शुध्द ,अखंड आहे .प्रकृतीने निर्माण केलेली भूतसृष्टी कल्पांती प्रकृतीतच विलीन होते .नवीन कल्पाच्या आरंभी प्रकृती पुन्हा कार्यरत होते .मी अध्यक्ष असून प्रकृती हे चराचर निर्माण करते .मला विनाशी अशा मनुष्य रुपात लोक पाहतात ,हे अज्ञान आहे ,तर विश्वा पलीकडचे माझे मूळ अव्यक्त असे रूप जाणून घेणे हा माझा ऐश्वर्य योग आहे .
ऐश्वर्य योग म्हणजे अद्वैत परमात्म तत्वाचे यथार्थ रूप विशद करणे -यात आत्मतत्व आणि सृष्टी यांचा संबंध उलगडून दाखवला आहे .हे अवाच्य असे ज्ञान भगवंतानी नवव्या अध्यायात वाच्य केले आहे
Subscribe to:
Posts (Atom)